Buldhana Accident : ऐन भाऊबीजेच्या दिवशी अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

बुलढाण्यात ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिली धडक


बुलढाणा : गेल्या काही दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले असून ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या (Bhaubeej) दिवशी देखील एक भीषण अपघात (Buldhana Accident) झाला. काल रात्री बाराच्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅव्हल्सने (Travels) दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील वडनेर गावाजवळ हा अपघात घडला. या भीषण धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.


या अपघातात मरण पावलेल्या तीनही व्यक्ती तरुण होत्या. भाऊबीजेच्या दिवशी त्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने आजूबाजूच्या परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्निल करणकार (वय २७ वर्ष, राहणार जळगाव खान्देश) गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्ष, राहणार वराड तालुका भुसावळ), आकाश राजू आखाडे (राहणार कल्याण) अशी मृत तरुणांची नावे आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण काल (बुधवारी) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक ६ येथून दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी मलकापूर येथून नांदुराकडे प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने निघाली होती. दरम्यान, वडनेर गावाजवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री