Buldhana Accident : ऐन भाऊबीजेच्या दिवशी अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

बुलढाण्यात ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिली धडक


बुलढाणा : गेल्या काही दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले असून ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या (Bhaubeej) दिवशी देखील एक भीषण अपघात (Buldhana Accident) झाला. काल रात्री बाराच्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅव्हल्सने (Travels) दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील वडनेर गावाजवळ हा अपघात घडला. या भीषण धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.


या अपघातात मरण पावलेल्या तीनही व्यक्ती तरुण होत्या. भाऊबीजेच्या दिवशी त्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने आजूबाजूच्या परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्निल करणकार (वय २७ वर्ष, राहणार जळगाव खान्देश) गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्ष, राहणार वराड तालुका भुसावळ), आकाश राजू आखाडे (राहणार कल्याण) अशी मृत तरुणांची नावे आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण काल (बुधवारी) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक ६ येथून दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी मलकापूर येथून नांदुराकडे प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने निघाली होती. दरम्यान, वडनेर गावाजवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी