Watch: तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी अहमदाबादेत पोहोचली टीम इंडिया

अहमदाबाद: एकदिवसीय विश्वचषक २०२३चा(world cup 2023) फायनल सामना १९ नोव्हेंबरला रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आङे. सामन्यातील पहिला फायनालिस्ट संघ भारत अहदमबादेत पोहोचला हे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला ७० धावांनी हरवले. आता भारतीय संघ अहमदाबादेत पोहोचला आहे. हॉटेलच्या बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.


टीम इंडिया अहमदाबाद पोहोचल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. टीमची बस अहमदाबादेत पोहोचत असताना चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आला. व्हिडिओमध्ये चाहत्यांचे प्रेम पाहायला मिळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने अहमदाबादेत पोहोचली आहे.


चाहते पुन्हा एकदा १२ वर्षांनी मेन इन ब्लूच्या हातात वनडे वर्ल्डकप ट्रॉफी पाहण्यास उत्सुक आहेत. भारतीय संघाने २०११मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. आता चाहते तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करतील.


 


सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला हरवले


स्पर्धेच्या लीग स्टेजमध्ये अजेय राहणाऱ्या टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला ७० धावांनी हरवले होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकाचा सेमीफायनलचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत ४ बाद ३९७ धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने जोरदार शतक ठोकली होती. भारतासाठी मोहम्मद शमीने ७ विकेट घेतल्या होत्या.

Comments
Add Comment

कुलदीप यादवने दिल्लीमध्ये केले नको ते शतक, बनवला हा खराब रेकॉर्ड

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

भारताला जिंकण्यासाठी हव्या १२१ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला

वर्ल्डकपमध्ये दोन पराभव, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? जाणून घ्या समीकरण

मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. या

IND vs AUS: ३३० धावा करूनही भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ३ गडी राखून पराभव, कर्णधार एलिसा हीलीचे विक्रमी शतक

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील एका अत्यंत रोमहर्षक आणि हाय-स्कोअरिंग सामन्यात, भारतीय महिला