ODI World Cup Final : वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहायला जाऊ शकतात पीएम नरेंद्र मोदी! अहमदाबादमध्ये १९ तारखेला होणार सामना

मुंबई: क्रिकेट वर्ल्डकपच्या(cricket world cup) पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडला हरवत भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी दुसरा सेमीफायनलचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जात आहे.


विश्वचषकातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या मैदाावरील पिचवर भारताचा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकतात.


विश्वचषकाचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. टॉप चार संघामध्ये भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला. आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आमनेसामने आहेत. यातील जिंकणारा संघ भारताविरुद्ध खेळणार आहे.



क्रिकेट चाहत्यांकडे क्रिकेटचा महाकुंभ पाहण्याची शेवटची संधी


विश्वचषक २०२३चा फायनल सामन १९ नोव्हेंबर २०२३ला अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. बीसीसीआयकडून फायनल सामन्यांच्या तिकीटांचे लाईव्ह बुकिंग सुरू केली आहे. क्रिकेट चाहत्यांकडे क्रिकेटचा महाकुंभ पाहण्याची शेवटची संधी आहे.



अहमदाबाद स्टेडियममध्ये १.३२ लाख प्रेक्षक क्षमता


नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १.३२ लाख प्रेक्षक क्षमता आहे. फायनल सामन्याआधी हे मैदान भारत वि पाकिस्तान महामुकाबल्यामध्ये प्रेक्षकांनी खचाखच भरला होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला सेमीफायनल सामना १५ नोव्हेंबरला वानखेडेच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक