ODI World Cup Final : वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहायला जाऊ शकतात पीएम नरेंद्र मोदी! अहमदाबादमध्ये १९ तारखेला होणार सामना

मुंबई: क्रिकेट वर्ल्डकपच्या(cricket world cup) पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडला हरवत भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी दुसरा सेमीफायनलचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जात आहे.


विश्वचषकातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या मैदाावरील पिचवर भारताचा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकतात.


विश्वचषकाचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. टॉप चार संघामध्ये भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला. आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आमनेसामने आहेत. यातील जिंकणारा संघ भारताविरुद्ध खेळणार आहे.



क्रिकेट चाहत्यांकडे क्रिकेटचा महाकुंभ पाहण्याची शेवटची संधी


विश्वचषक २०२३चा फायनल सामन १९ नोव्हेंबर २०२३ला अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. बीसीसीआयकडून फायनल सामन्यांच्या तिकीटांचे लाईव्ह बुकिंग सुरू केली आहे. क्रिकेट चाहत्यांकडे क्रिकेटचा महाकुंभ पाहण्याची शेवटची संधी आहे.



अहमदाबाद स्टेडियममध्ये १.३२ लाख प्रेक्षक क्षमता


नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १.३२ लाख प्रेक्षक क्षमता आहे. फायनल सामन्याआधी हे मैदान भारत वि पाकिस्तान महामुकाबल्यामध्ये प्रेक्षकांनी खचाखच भरला होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला सेमीफायनल सामना १५ नोव्हेंबरला वानखेडेच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता.

Comments
Add Comment

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिका, भारत-आफ्रिका आमनेसामने; दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान संपण्याआधीच टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी करत