Shami : कधीकाळी आत्महत्येचा विचार करत होता मोहम्मद शमी, आज बनला देशाचा हिरो

मुंबई: जर मला माझ्या कुटुंबाची साथ मिळाली नाही तर मी क्रिकेट सोडले असते. मी ३ वेळा जीव देण्याचा विचार केला होता. माझे घर २४व्या मजल्यावर होते आणि माझ्या कुटुंबाला वाटत होते की मी अपार्टमेंटमधून उडी मारणार नाही ना. हे शब्द होते भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीचे. ती वेळ होती जेव्हा त्याने आपल्या जीवनातील सर्वात कठीण काळाची आठवण काढवली होती. मात्र जसजसा वेळ जात गेला तसतसा कठीण काळ सरत गेला आणि शमीने इतिहास लिहिला. आज शमीला जगातील गोलंदाजीचा हिरो मानले जाते.


शमीने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळवल्या गेलेल्या विश्वचषक २०२३च्या सेमीफायनलमध्ये ७ विकेटनी भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात तो वनडे क्रिकेटमध्ये चौथ्यांदा पाच विकेट घेणारा गोलंदाज ठरला. याशिवाय त्याच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. तो विश्वचषकात ५० विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.



तीन तीन वेळा केला होता आत्महत्येचा विचार


इथपर्यंत पोहोचण्याचा शमीचा प्रवास हा काही सोपा नव्हता. गेल्या काही वर्षांपासून शमीवर भरपूर आरोप तसेच वाद होत आहेत. त्यामुळे शमीने एकदा नव्हे तर तीन वेळा आत्महत्येचा विचार केला होता. ही ती वेळ होती जेव्हा २०१५मध्ये तो दुखापतीतून सावरत होती. त्याचवेळेस त्याच्या खासगी आयुष्यातही खूप उलथापालथ झाली होती. मात्र नशीबात काही वेगळेच लिहिले होते. कुटुंबाची साथ लाभली आणि आपल्या कठीण काळाशी लढून ते या मुक्कामापर्यंत पोहोचले.



कुटुंबाची साथ नसती तर काही भयानक झाले असते


त्याने सांगितले, माझे कुटुंब माझ्यासोबत होते आणि यापेक्षा मोठी ताकद कोणती असू शकत नाही. ते मला सांगत होते की प्रत्येक समस्येवर तोडगा असतो आणि मी केवळ खेळावर लक्ष द्यावे. ज्या गोष्टीत तु चांगला आहेस त्यात वेळ घालव.मला नव्हते माहीत की मी काय करत होते. मी दबावात होतो. सरावाच्या वेळेस मी दुखी होत होतो. माझे कुटुंबीय मला सांगत होते की फोकस कर. माझा भाऊ माझ्यासोबत होता. काही मित्र माझ्यासोबत होते.

Comments
Add Comment

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि

भारत पाकिस्तान सामन्यावेळी हस्तांदोलन झाले की नाही ?

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्याच्या

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना