Shami : कधीकाळी आत्महत्येचा विचार करत होता मोहम्मद शमी, आज बनला देशाचा हिरो

मुंबई: जर मला माझ्या कुटुंबाची साथ मिळाली नाही तर मी क्रिकेट सोडले असते. मी ३ वेळा जीव देण्याचा विचार केला होता. माझे घर २४व्या मजल्यावर होते आणि माझ्या कुटुंबाला वाटत होते की मी अपार्टमेंटमधून उडी मारणार नाही ना. हे शब्द होते भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीचे. ती वेळ होती जेव्हा त्याने आपल्या जीवनातील सर्वात कठीण काळाची आठवण काढवली होती. मात्र जसजसा वेळ जात गेला तसतसा कठीण काळ सरत गेला आणि शमीने इतिहास लिहिला. आज शमीला जगातील गोलंदाजीचा हिरो मानले जाते.


शमीने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळवल्या गेलेल्या विश्वचषक २०२३च्या सेमीफायनलमध्ये ७ विकेटनी भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात तो वनडे क्रिकेटमध्ये चौथ्यांदा पाच विकेट घेणारा गोलंदाज ठरला. याशिवाय त्याच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. तो विश्वचषकात ५० विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.



तीन तीन वेळा केला होता आत्महत्येचा विचार


इथपर्यंत पोहोचण्याचा शमीचा प्रवास हा काही सोपा नव्हता. गेल्या काही वर्षांपासून शमीवर भरपूर आरोप तसेच वाद होत आहेत. त्यामुळे शमीने एकदा नव्हे तर तीन वेळा आत्महत्येचा विचार केला होता. ही ती वेळ होती जेव्हा २०१५मध्ये तो दुखापतीतून सावरत होती. त्याचवेळेस त्याच्या खासगी आयुष्यातही खूप उलथापालथ झाली होती. मात्र नशीबात काही वेगळेच लिहिले होते. कुटुंबाची साथ लाभली आणि आपल्या कठीण काळाशी लढून ते या मुक्कामापर्यंत पोहोचले.



कुटुंबाची साथ नसती तर काही भयानक झाले असते


त्याने सांगितले, माझे कुटुंब माझ्यासोबत होते आणि यापेक्षा मोठी ताकद कोणती असू शकत नाही. ते मला सांगत होते की प्रत्येक समस्येवर तोडगा असतो आणि मी केवळ खेळावर लक्ष द्यावे. ज्या गोष्टीत तु चांगला आहेस त्यात वेळ घालव.मला नव्हते माहीत की मी काय करत होते. मी दबावात होतो. सरावाच्या वेळेस मी दुखी होत होतो. माझे कुटुंबीय मला सांगत होते की फोकस कर. माझा भाऊ माझ्यासोबत होता. काही मित्र माझ्यासोबत होते.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक