Shami : कधीकाळी आत्महत्येचा विचार करत होता मोहम्मद शमी, आज बनला देशाचा हिरो

  154

मुंबई: जर मला माझ्या कुटुंबाची साथ मिळाली नाही तर मी क्रिकेट सोडले असते. मी ३ वेळा जीव देण्याचा विचार केला होता. माझे घर २४व्या मजल्यावर होते आणि माझ्या कुटुंबाला वाटत होते की मी अपार्टमेंटमधून उडी मारणार नाही ना. हे शब्द होते भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीचे. ती वेळ होती जेव्हा त्याने आपल्या जीवनातील सर्वात कठीण काळाची आठवण काढवली होती. मात्र जसजसा वेळ जात गेला तसतसा कठीण काळ सरत गेला आणि शमीने इतिहास लिहिला. आज शमीला जगातील गोलंदाजीचा हिरो मानले जाते.


शमीने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळवल्या गेलेल्या विश्वचषक २०२३च्या सेमीफायनलमध्ये ७ विकेटनी भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात तो वनडे क्रिकेटमध्ये चौथ्यांदा पाच विकेट घेणारा गोलंदाज ठरला. याशिवाय त्याच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. तो विश्वचषकात ५० विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.



तीन तीन वेळा केला होता आत्महत्येचा विचार


इथपर्यंत पोहोचण्याचा शमीचा प्रवास हा काही सोपा नव्हता. गेल्या काही वर्षांपासून शमीवर भरपूर आरोप तसेच वाद होत आहेत. त्यामुळे शमीने एकदा नव्हे तर तीन वेळा आत्महत्येचा विचार केला होता. ही ती वेळ होती जेव्हा २०१५मध्ये तो दुखापतीतून सावरत होती. त्याचवेळेस त्याच्या खासगी आयुष्यातही खूप उलथापालथ झाली होती. मात्र नशीबात काही वेगळेच लिहिले होते. कुटुंबाची साथ लाभली आणि आपल्या कठीण काळाशी लढून ते या मुक्कामापर्यंत पोहोचले.



कुटुंबाची साथ नसती तर काही भयानक झाले असते


त्याने सांगितले, माझे कुटुंब माझ्यासोबत होते आणि यापेक्षा मोठी ताकद कोणती असू शकत नाही. ते मला सांगत होते की प्रत्येक समस्येवर तोडगा असतो आणि मी केवळ खेळावर लक्ष द्यावे. ज्या गोष्टीत तु चांगला आहेस त्यात वेळ घालव.मला नव्हते माहीत की मी काय करत होते. मी दबावात होतो. सरावाच्या वेळेस मी दुखी होत होतो. माझे कुटुंबीय मला सांगत होते की फोकस कर. माझा भाऊ माझ्यासोबत होता. काही मित्र माझ्यासोबत होते.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल