India-Canada Tension: पुरावे द्या, आम्ही तपासासाठी तयार, निज्जर वादावर परराष्ट्र मंक्षी जयशंकर यांचे कॅनडाला उत्तर

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(s jaishankar) ब्रिटन दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ते एका कार्यक्रमात चीन, कॅनडासह अनेक मुद्द्यांवर बोलले. एस जयशंकर म्हणाले, भारत सरकार खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येशी संबंधित तपासासाठी नकार देत नाही आहे. मात्र कॅनडाच्या सरकारला आपले दावे सिद्ध करण्यासाठी पुरावे दाखवले पाहिजेत. यात कॅनडा सरकारचे म्हणणे आहे की निज्जर हत्या प्रकरणात भारतीय एजंट्सचा हात होता.


जयशंकरने ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये उत्तर प्रदेशातील लोखरी येथून ८व्या शतकात चोरलेल्या मंदिराच्या मूर्ती , योगिनी चामुंडा आणि योगिनी गोमुखी यांच्या पुनरागमन सोहळ्यात भाग घेतला. येथे त्यांनी कॅनडा आणि त्यांनी लावलेल्या आरोपांवर बातचीत केली. कॅनडाने केलेल्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केले.



आम्हाला पुरावे दाखवा, आम्ही तपासासाठी तयार


परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, आम्ही कॅनडाच्या लोकांना सांगितले आहे. खरंतर ही गोष्ट आहे की कॅनडाच्या राजकारणात हिंसा आणि दहशतवाद्यांना स्थान मिळाले आहे. त्यांच्याकडे आपले विचार ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र बोलणे अथवा अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य एका जबाबदारीसह मिळते.


या स्वातंत्र्याचा चुकीचा वापर आणि राजकीय उद्देशांसाठी त्यांचा दुरूपयोग करणे योग्य नाही. जर तुमच्याकडे असे आरोप करण्याचे कारण आहे तर त्यासाठीचे पुरावे आम्हाला द्या. आम्ही तपासास नकार नाही.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे

पीएनजी असलेल्या भागात एलपीजी पुरवठा होणार बंद

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले