India-Canada Tension: पुरावे द्या, आम्ही तपासासाठी तयार, निज्जर वादावर परराष्ट्र मंक्षी जयशंकर यांचे कॅनडाला उत्तर

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(s jaishankar) ब्रिटन दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ते एका कार्यक्रमात चीन, कॅनडासह अनेक मुद्द्यांवर बोलले. एस जयशंकर म्हणाले, भारत सरकार खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येशी संबंधित तपासासाठी नकार देत नाही आहे. मात्र कॅनडाच्या सरकारला आपले दावे सिद्ध करण्यासाठी पुरावे दाखवले पाहिजेत. यात कॅनडा सरकारचे म्हणणे आहे की निज्जर हत्या प्रकरणात भारतीय एजंट्सचा हात होता.


जयशंकरने ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये उत्तर प्रदेशातील लोखरी येथून ८व्या शतकात चोरलेल्या मंदिराच्या मूर्ती , योगिनी चामुंडा आणि योगिनी गोमुखी यांच्या पुनरागमन सोहळ्यात भाग घेतला. येथे त्यांनी कॅनडा आणि त्यांनी लावलेल्या आरोपांवर बातचीत केली. कॅनडाने केलेल्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केले.



आम्हाला पुरावे दाखवा, आम्ही तपासासाठी तयार


परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, आम्ही कॅनडाच्या लोकांना सांगितले आहे. खरंतर ही गोष्ट आहे की कॅनडाच्या राजकारणात हिंसा आणि दहशतवाद्यांना स्थान मिळाले आहे. त्यांच्याकडे आपले विचार ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र बोलणे अथवा अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य एका जबाबदारीसह मिळते.


या स्वातंत्र्याचा चुकीचा वापर आणि राजकीय उद्देशांसाठी त्यांचा दुरूपयोग करणे योग्य नाही. जर तुमच्याकडे असे आरोप करण्याचे कारण आहे तर त्यासाठीचे पुरावे आम्हाला द्या. आम्ही तपासास नकार नाही.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली: