मुंबई : बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे जगभरात अनेक चाहते आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षीदेखील ते फार उत्साहाने काम करतात. सध्याच्या काळासोबत ट्रेंडी राहण्याचा देखील त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. ते सोशल मीडियावरदेखील अॅक्टिव्ह (Social Media Active) असतात. मात्र, याच सोशल मीडियावरील त्यांच्या एका पोस्टमुळे क्रिकेटप्रेमींनी त्यांना थेट वर्ल्डकप फायनलचा सामना (ICC World Cup Final Match) न पाहण्याची विनंती केली आहे.
बिग बींचं क्रिकेटप्रेम तर सर्वश्रुतच आहे. काल पार पडलेल्या वर्ल्डकपच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड (India Vs Newzealand) या उपांत्य फेरीतील भारताच्या विजयानंतर सगळीकडे जल्लोष करण्यात आला. बिग बींनीही यावर अगदी एका ओळीत ट्विट केलं. या ट्विटवर मात्र धडाधड बच्चनसरांनी फायनल सामना न पाहण्याची विनंती करणार्या कमेंट्स आल्या. असं काय होतं ते ट्विट ज्यामुळे चाहत्यांना ही विनंती करावी लागली?
काल भारत जिंकल्यानंतर भारतीयांचा आनंद ओसंडून वाहत होता. अमिताभ बच्चन यांनाही या गोष्टीचा खूप आनंद झाला आणि त्यांनी एक मजेशीर ट्विट केलं. त्यांनी लिहिलं की, जेव्हा मी सामना पाहत नाही तेव्हा आपण जिंकतो. त्यांच्या या ट्विटवर क्रिकेटप्रेमी म्हणाले, असं असेल तर तुम्ही फायनलचा सामनादेखील पाहू नका म्हणजे आपण नक्कीच जिंकू.
एका क्रिकेटप्रेमीने तर चक्क एका अभिनेत्याचा डोळ्यांवर पट्टी बांधलेला लूक शेअर करत म्हटले, की वर्ल्डकप फायनलच्या दिवशी तुम्ही असे राहा. एका यूजरने लिहिले की, ‘सर फायनल मॅच पाहू नका.’ दुसऱ्याने लिहिले, ‘बच्चन सर, घरातच राहा.’ दुसर्या युजरने कमेंट केली की, ‘वर्ल्ड कप फायनलच्या दिवशी अमिताभ यांना एका दुर्गम बेटावर लॉक करण्याची काहीतरी व्यवस्था करूया.’ अशा प्रकारे युजर्सनी गंमतीशीर कमेंट करत अमिताभ यांना वर्ल्डकप फायनल न पाहण्याचा सल्ला दिला आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…