Nitesh Rane : संजय राऊतांच्या प्रतिज्ञापत्रात घोळ; त्यांचा वाढदिवस नक्की आज?

  278

आमदार नितेश राणे यांनी केला नवा खुलासा


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र त्यांचा वाढदिवस नेमका आजच आहे का, असा एक मोठा प्रश्न भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला आहे. राज्यसभेच्या खासदारकीसाठी संजय राऊतांनी प्रतिज्ञापत्रात (Affidavit) केलेला घोळ नितेश राणे यांनी आज उघड केला. जन्मतारखेत बदल केल्याचं पितळ उघडं पाडत संजय राऊतांना नेमक्या शुभेच्छा कधी द्यायच्या असं विचारत नितेश राणे यांनी राऊतांना चांगलंच धारेवर धरलं आहे.


उबाठा सेनेमध्ये (Ubatha Group) उद्धव ठाकरेसकट (Uddhav Thackeray) सगळे सोंगाडे आणि ४२० भरले आहेत. एक तो चिपळूणचा सोंगाड्या आणि दुसरा भांडुपचा देवानंद. काही लोक जन्मजात सोंगाडे असतात. संजय राजाराम राऊतने हे सांगावं की २००४ ते २०१६ पर्यंत तुमच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्या प्रतिज्ञापत्रात तुमचा वाढदिवस हा १५ एप्रिल १९६१ चा आहे, आणि २०१६ ते २०१९ पर्यंत तुम्ही जे प्रतिज्ञापत्र भरलं त्यात तुमचा वाढदिवस १५ नोव्हेंबर १९६१ आहे.


मग जन्मतारीख नेमकी का बदलली? यामध्ये कुठली चारसौबीसी आहे? याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्टीकरण मिळालं पाहिजे. तुम्हाला शुभेच्छा नेमक्या आज द्यायच्या की १५ एप्रिलला याबद्दल जरा आजच्या दिवशी तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्ञानात भर टाका, असं नितेश राणे म्हणाले.






Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये