Crime News : फटाके फोडण्यावरून पाथर्डी गाव परिसरात युवकाची कोयत्याने हत्या

एक संशयित पोलिसांच्या ताब्यात


सिडको : पूर्व वैमनस्यातून फटाके फोडतांना झालेल्या वादानंतर मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मित्रांनीच पाथर्डी गावालगत स्वराज्य नगर येथे एका युवकाचा कोयत्याने सपासप वार करून खून केला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून काहींना ताब्यात घेतले आहे . ऐन दिवाळी सणात खून झाल्याने परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गौरव तुकाराम आखाडे ( वय ३१) असे मयताचे नाव आहे.


या बाबत पोलिसांनी सांगितले की. पाथर्डी गावालगत स्वराज्य नगर येथे रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान इमारतीच्या खाली गौरव तुकाराम आखाडे ( वय ३१) याला फटाके फोडण्यावरून व मागील कारणावरून त्याच्या व परिसरात राहणा-या मित्रांनी कोयत्याने त्याच्या शरीरावर सपासप वार केले. गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.


मयत गौरव याची पत्नी सपना आखाडे हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून काहीना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सोनार करीत आहेत.

Comments
Add Comment

वर्धा शहरातील रामनगर येथील भूखंड मालकी हक्काने देण्यास मंजुरी

मुंबई : वर्धा नगरपरिषदेच्या मालकीचे रामनगरमधील भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने करून

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम कार्यक्रमासाठी ९५.३५ कोटींची तरतूद

मुंबई : शिख धर्माचे नववे गुरू आणि ‘हिंद-की-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी

मच्छिमारांना कर्जावर चार टक्के व्याज सवलत

मुंबई : राज्यातील मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादकांसह किसान क्रेडिट कार्डधारक मत्स्यव्यावसायिकांना २

सोलापूरच्या असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांचा मार्ग मोकळा

मुंबई : सोलापूर येथील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर)

नागपूरच्या लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठास सात कोटी रुपयांचा निधी

मुंबई : नागपूर येथील लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेस जीव रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र

Breaking News : राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले; २ डिसेंबरला होणार मतदान

राज्यात आचारसंहिता लागू २४६ नगरपरिषद, ४२ नगरपंचायतींसाठी होणार मतदान २ डिसेंबरला मतदान, ३