Crime News : फटाके फोडण्यावरून पाथर्डी गाव परिसरात युवकाची कोयत्याने हत्या

एक संशयित पोलिसांच्या ताब्यात


सिडको : पूर्व वैमनस्यातून फटाके फोडतांना झालेल्या वादानंतर मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मित्रांनीच पाथर्डी गावालगत स्वराज्य नगर येथे एका युवकाचा कोयत्याने सपासप वार करून खून केला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून काहींना ताब्यात घेतले आहे . ऐन दिवाळी सणात खून झाल्याने परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गौरव तुकाराम आखाडे ( वय ३१) असे मयताचे नाव आहे.


या बाबत पोलिसांनी सांगितले की. पाथर्डी गावालगत स्वराज्य नगर येथे रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान इमारतीच्या खाली गौरव तुकाराम आखाडे ( वय ३१) याला फटाके फोडण्यावरून व मागील कारणावरून त्याच्या व परिसरात राहणा-या मित्रांनी कोयत्याने त्याच्या शरीरावर सपासप वार केले. गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.


मयत गौरव याची पत्नी सपना आखाडे हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून काहीना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सोनार करीत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ