World Cup 2023: जर पावसामुळे फायनल-सेमीफायनल रद्द झाला तर काय होणार?

मुंबई: विश्वचषकमध्ये(world cup 2023) लीग स्टेजमध्ये सर्व सामने संपले आहेत. आता फायनल आणि सेमीफायनलचे सामने बाकी आहेत. या विश्वचषकात सेमीफायनलमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ पोहोचले आहेत.


सेमीफायनलचा पहिला सामना १५ नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार आहे. तर विश्वचषकातील दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये रंगणार आहे. या दोन सामन्यात जिंकणारा संघ फायनलला पोहोचणार आहे. त्यानंतर यांच्यातील विजेते संघ फायनलमध्ये भिडणार आहेत. १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा अंतिम सामना रंगणार आहे.



रिझर्व्ह डे बाबत आयसीसीने केले कन्फर्म


अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात असा प्रश्न आहे की जर सेमीफायनल आणि फायनल सामन्याच्या वेळेस पाऊस पडला तर काय होणार? याबाबतीत आयसीसीने कन्फर्म केले की दोन्ही सेमीफायनलचे सामने आणि फायनलचा सामन्यासाठी एक एक दिवसाचा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.


१५ नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सेमीफायनलच्या सामन्यासाठी रिझर्व्ह डे १६ नोव्हेंबरला असेल. तर १६ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सेमीफायनल सामन्यासाठी १७ नोव्हेंबरला राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.


२०१९च्या विश्वचषकात भारताचा सेमीफायनचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. यानंतर सामना राखीव दिवशी पूर्ण करण्यात आला होता. यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळेस रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने लीग स्टेजमधील सर्व सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडने सुरूवातीला चांगले क्रिकेट खेळले होते. मात्र त्यानंतर सलग ४ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता.

Comments
Add Comment

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.