Health: तुम्ही ७ तासांपेक्षा कमी झोपता का? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

मुंबई: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे लोकांना झोपायलाही पुरेसा वेळ मिळत नाही आहे. आपल्या शरीरासाठी पुरेशी झोप गरजेची असते. यामुळे डोके शांत राहते. पाचनक्रिया तंदुरुस्त राहते. सोबतच रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. झोपेच्या कमतरतेमुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आरोग्य तज्ञांच्या मते प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी ७ ते ९ तासांची झोप गरजेची असते. आपल्या निरोगी आरोग्यासाठी हे गरजेचे असते.



का गरजेची आहे ७ तासांची झोप?


७ तासादरम्यान तुमचे शरीर रिपेअर मोडमध्ये जाते. या दरम्यान तुमचे स्नायू तसेच मसल्सयांची पुर्ननिर्मिती होती.यामुळे ताजेतवाने होते. मेंदूसाठीही पुरेशी झोप घेणे गरजेचे असते. यामुळे मेंदूला पुन्हा एनर्जी मिळते.


थकवा - जर तुम्ही ७ तासांपेक्षा कमी झोपत आहात तर तुमचे शरीर नेहमी थकलेले असू शकते. तसेच संपूर्ण दिवस हा थकवा राहतो. सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला फ्रेश वाटत नाही. यामुळे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते.


वजन वाढणे - झोप आणि वजनाचा खूप खोल संबंध आहे. पुरेशी झोप न घेतल्याने शरीरात दोन हार्मोन्स ग्रेलिन आणि लेप्टिनचे संतुलन बिघडते. ग्रेलिन हार्मोन भुकेला उत्तेजित करते.तर लेप्टिन हार्मोन पोट भरल्याचे संकेत देतात.


मानसिक स्थितीवर परिणाम - कमी झोपल्याने त्याचा सरळ परिणाम मानसिक स्थितीवर होते. जेवढा वेळ आपण झोपतो तेवढा आपला मेंदू रिफ्रेश होतो. मात्र झोप पूर्ण न झाल्याने मेंदू फ्रेश होते नाही. यामुळे मानसिक समस्या जाणवता.


हार्ट अॅटॅक - जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीर रिपेअर होत असते मात्र झोप पूर्ण न झाल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जात नाहीत. यामुळे ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. यामुळे हार्ट अॅटॅक येण्याचा धोका असतो.

Comments
Add Comment

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक, वेळापत्रक बघून प्रवासाचं नियोजन करा

मुंबई : ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक घेणार आहे. पश्चिम रेल्वेने वसई रोड

Nitesh Rane : 'समुद्र माझा, मी समुद्राचा'! जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त वर्सोवा किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

मुंबई : जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधत आज राज्यभरात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या

एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत आंदोलनाच्या तयारीत

एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत आंदोलनाच्या तयारीत मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत पुन्हा एकदा आंदोलन

मेट्रो-३ संपूर्ण मार्गिकेसाठी तिकीट दर निश्चित

मेट्रो-३ संपूर्ण मार्गिकेसाठी तिकीट दर निश्चित मुंबई (प्रतिनिधी) : शहरातील ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या

‘ॲप’टॅक्सी भाडे प्रति किमी २२.७२ रुपये

‘ॲप’टॅक्सी भाडे प्रति किमी २२.७२ रुपये मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी मुंबई (प्रतिनिधी): अॅप आधारित

खड्ड्यांमुळे राज्यात आतापर्यंत १२ मृत्यू

खड्ड्यांसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरा : उच्च न्यायालय मुंबई (प्रतिनिधी): रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या