Murder: उधारीचे २०० रूपये परत मागितल्याने केली तरूणाची हत्या, तिघांना अटक, दोन फरार

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एका तरूणाच्या हत्येचे प्रकरण समोर आलेआहे. ही हत्या केवळ २०० रूपयांसाठी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचली आणि मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. या घटनेनंतर मृत तरूणाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


ही घटना नगलापान सहाय येथील आहे. येथे राहणाऱ्या कमलेशने ओळखीच्या भूपेंद्रला २०० रूपये उधार दिले होते. बऱ्याच दिवसांपासून तो भूपेंद्रकडे पैसे मागत होता. मात्र भूपेंद्र काही पैसे परत करत नव्हता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यादरम्यान शिवीगाळ झाली तसेच मारझोडही झाली. यानंतर कमलेशने बदला घेण्यासाठी आपल्या ५ साथीदारांसह भूपेंद्रला धडा शिकवण्याचा प्लान बनवला.



उधारीचे २०० रूपये मागण्यावरून झाली हत्या


९ नोव्हेंबरच्या रात्री जेवायला म्हणून भूपेंद्रला एकट्याला बोलावले. त्याला तेथे दारू पाजण्यात आली. त्यानंतर ५ मित्रांसह मिळून त्याची हत्या करून त्याचा मृतदेह झाडीत फेकण्यात आला. पोलिसांनी या हत्येचा खुलासा करताना दीवान सिंह, विजय आणि मनोज यांना अठक केली. याशिवाय यातील दोन अन्य आरोपी फरार आहेत.

Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली