Murder: उधारीचे २०० रूपये परत मागितल्याने केली तरूणाची हत्या, तिघांना अटक, दोन फरार

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एका तरूणाच्या हत्येचे प्रकरण समोर आलेआहे. ही हत्या केवळ २०० रूपयांसाठी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचली आणि मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. या घटनेनंतर मृत तरूणाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


ही घटना नगलापान सहाय येथील आहे. येथे राहणाऱ्या कमलेशने ओळखीच्या भूपेंद्रला २०० रूपये उधार दिले होते. बऱ्याच दिवसांपासून तो भूपेंद्रकडे पैसे मागत होता. मात्र भूपेंद्र काही पैसे परत करत नव्हता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यादरम्यान शिवीगाळ झाली तसेच मारझोडही झाली. यानंतर कमलेशने बदला घेण्यासाठी आपल्या ५ साथीदारांसह भूपेंद्रला धडा शिकवण्याचा प्लान बनवला.



उधारीचे २०० रूपये मागण्यावरून झाली हत्या


९ नोव्हेंबरच्या रात्री जेवायला म्हणून भूपेंद्रला एकट्याला बोलावले. त्याला तेथे दारू पाजण्यात आली. त्यानंतर ५ मित्रांसह मिळून त्याची हत्या करून त्याचा मृतदेह झाडीत फेकण्यात आला. पोलिसांनी या हत्येचा खुलासा करताना दीवान सिंह, विजय आणि मनोज यांना अठक केली. याशिवाय यातील दोन अन्य आरोपी फरार आहेत.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च