प्रहार    

Murder: उधारीचे २०० रूपये परत मागितल्याने केली तरूणाची हत्या, तिघांना अटक, दोन फरार

  114

Murder: उधारीचे २०० रूपये परत मागितल्याने केली तरूणाची हत्या, तिघांना अटक, दोन फरार

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एका तरूणाच्या हत्येचे प्रकरण समोर आलेआहे. ही हत्या केवळ २०० रूपयांसाठी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचली आणि मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. या घटनेनंतर मृत तरूणाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


ही घटना नगलापान सहाय येथील आहे. येथे राहणाऱ्या कमलेशने ओळखीच्या भूपेंद्रला २०० रूपये उधार दिले होते. बऱ्याच दिवसांपासून तो भूपेंद्रकडे पैसे मागत होता. मात्र भूपेंद्र काही पैसे परत करत नव्हता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यादरम्यान शिवीगाळ झाली तसेच मारझोडही झाली. यानंतर कमलेशने बदला घेण्यासाठी आपल्या ५ साथीदारांसह भूपेंद्रला धडा शिकवण्याचा प्लान बनवला.



उधारीचे २०० रूपये मागण्यावरून झाली हत्या


९ नोव्हेंबरच्या रात्री जेवायला म्हणून भूपेंद्रला एकट्याला बोलावले. त्याला तेथे दारू पाजण्यात आली. त्यानंतर ५ मित्रांसह मिळून त्याची हत्या करून त्याचा मृतदेह झाडीत फेकण्यात आला. पोलिसांनी या हत्येचा खुलासा करताना दीवान सिंह, विजय आणि मनोज यांना अठक केली. याशिवाय यातील दोन अन्य आरोपी फरार आहेत.

Comments
Add Comment

किश्तवाडमधील ढगफुटीत ४० हून अधिक जणांचा मृत्यू, १५० जण बेपत्ता

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी दुपारी १२:३० वाजता ढगफुटी झाली. डोंगरावरून

SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : बिहारमधील SIR प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत दिग्गज वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

स्वातंत्र्य दिनानिमित्त १०९० जणांना शौर्य/सेवा पदके जाहीर, महाराष्ट्राचे मानकरी येथे पहा...

महाराष्ट्रातल्या ०७ पोलिसांना शौर्य पदक, ०३ पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक ३९ पोलिसांना

मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले आणि...

नवी दिल्ली : दिल्लीत कालकाजी येथे मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले.

Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, किन्नौर ढगफुटीने उध्वस्त; घरं-गाड्या पुरात गेल्या वाहून

किन्नौर : हिमाचल प्रदेशात निसर्गाने पुन्हा एकदा आपला प्रकोप दाखवला आहे. किन्नौर जिल्ह्यातील ऋषी डोंगरी खोऱ्यात

राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी