Punjab Accident : पंजाबमध्ये तब्बल शंभर गाड्या एकमेकांवर आदळल्या!

अपघाताचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल...


पंजाब : देशभरात प्रदूषणाचे (Pollution) प्रमाण प्रचंड वाढले असून ही बाब फार चिंताजनक आहे. अनेकांना श्वसनाचे विकार उद्भवत आहेत, तर दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी श्वास घेतानाही अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, शारीरिक समस्या उद्भवत असतानाच आता प्रदूषणामुळे आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमध्ये प्रदूषणाने दृश्यमानता कमी झाल्यामुळे चालकांना गाडी चालवताना समोरचे नीट दिसले नाही आणि तब्बल १०० गाड्या एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात (Punjab Accident) झाला.


पंजाबमध्ये लुधियाणामधील खन्ना येथे दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर सकाळच्या सुमारास १०० वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. दुर्घटनाग्रस्त वाहनांमध्ये पंजाब रोडवेजच्या बसचाही समावेश आहे. धुक्यामुळे वाहने एकमेकांवर आदळल्याने हा भीषण अपघात घडला. यात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींची नेमकी संख्या समोर आली नाही. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारांकरता दाखल करण्यात आले आहे.


सुमारे २०-२५ किलोमीटर अंतरापर्यंत वाहने एकमेकांवर आदळली. धुक्यामुळे समोरचं दिसत नसल्याने मागून येणाऱ्या गाड्या धडाधड एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोडींची समस्या निर्माण झाली होती. प्रशासन आणि पोलिसांनी खराब झालेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. गाड्यांचे नुकसान झाल्यामुळे जीवितहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीही झाल्याची माहिती समोर येत आहे.



प्रदूषणाची वाढती समस्या


दिल्ली आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये प्रदूषणाची मोठी समस्या आहे. यातच गेले काही दिवस शेतकरी शेतातील तण जाळत आहेत. तसेच फटाकेही मोठ्या प्रमाणावर वाजवले जात आहेत. याचा परिणाम थंडीतल्या धुक्यांत धूळ, धुर मिळून धुरक्यात होत आहे. यामुळे रात्रीचीच नाही तर दिवसाचीही दृष्यमानता कमी होत आहे.

Comments
Add Comment

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे