Onkar Bhojane : माझं असंच आहे, मला वाटलं तर मी येतो, नाही तर मी येत नाही...

हास्यजत्रा सोडलेला ओंकार भोजने पुन्हा करणार एन्ट्री?


मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी प्रहसनांचा (Comedy skits) कार्यक्रम सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. यातील कलाकारांच्या विनोदाचं अचूक टायमिंग, नवनवीन विषय व ते हाताळताना प्रेक्षकांना हसवण्याची पद्धत यांमुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. यातील प्रत्येक कलाकाराने जी वेगवेगळी पात्रं रंगवली आहेत, तीदेखील प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. यामध्ये नम्रता संभेरावची (Namrata Sambherao) लॉली असो, प्रसाद खांडेकरचा (Prasad Khandekar) स्लोमॅन, समीर चौघुलेचा (Samir Choughule) सुमारिया चौघुलिया किंवा लोचन मजनू अशी अनेक पात्रे प्रेक्षकांना खळखळून हसवतात.


याच हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळालेला कलाकार म्हणजे ओंकार भोजने (Onkar Bhojane). ओंकारने काही महिन्यांपूर्वी हास्यजत्रा सोडली होती. तो पुन्हा येणार नाही अशी चर्चा असल्याने प्रेक्षकांची चांगलीच निराशा झाली होती. ओंकारचं अगं अगं आई हे स्किट असो, किंवा वायरमॅन तात्या, किंवा वनिता खरातसोबत मामा मामीचं स्किट अशी ओंकारची सर्वच पात्रं प्रेक्षकांना आवडत असताना त्याने असा का ब्रेक घेतला असा प्रश्न पडला होता.


दरम्यान, ओंकारचे 'सरला एक कोटी' व 'बॉईज ४' असे दोन चित्रपट आले. या चित्रपटांच्या शूटिंगमुळेच हास्यजत्रेतून ब्रेक घ्यावा लागला असं त्याने स्पष्ट केलं आहे. यानंतर तो पुन्हा एकदा हास्यजत्रेतून प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या नव्या स्किटचा प्रोमो आला असून यात ओंकार 'माझं असंच आहे, मला वाटलं तर मी येतो, नाही तर मी येत नाही...' असा एक डायलॉग म्हणतो आणि त्यावर सगळे खूप हसतात. म्हणजेच ओंकारची एन्ट्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे.


ओंकार भोजने याविषयी सांगतो की, 'सगळं छान सुरु होतं, पण मला पुढे दोन चित्रपटांसाठी थांबायचं होतं. त्यांना पण अॅडजेस्टमेंट करावी लागणार होती. माझ्या प्रकृतीच्या पण काही तक्रारी होत्या. तेव्हा सुट्टी घेतली ती कायमचीच. नंतर मी फू बाई फू मध्ये काम केलं. मी या सगळ्यामधून शिकत आहे.' ओंकार भोजने आता हास्यजत्रेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments
Add Comment

आयएएस तुकाराम मुंढे आता मंत्री झिरवळ यांच्या विभागात

२१ वर्षांच्या कार्यकाळात २५वी बदली; अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार स्वीकारणार मुंबई : आपल्या कडक

मुंबईला जलमुक्त करण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन

मुंबई : मुंबई महानगराची भौगोलिक रचना लक्षात घेता सखल भागांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा जलद आणि

आर्थिक संकटातील बेस्टची मदतीसाठी राज्य-केंद्राकडे धाव

मुंबई : बेस्टच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत उपदान (ग्रॅच्युटी)

संपूर्ण कोकणाला जलवाहतुकीने जोडणार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या ३ वर्षांत मुंबई-महानगरात २७ जेट्टी कार्यान्वित करणार मुंबई : "मुंबई महानगर

ओबीसी समाजाच्या विकासासाठी केंद्र-राज्य समन्वयातून योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी

 ओबीसी समाजाचा विकास राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया;ओबीसी सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध मुंबई: ओबीसी

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मंगळवारी,