Maharashtra Weather: राज्यात कसे असणार हवामान, पावसाबाबत IMD दिले हे अपडेट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. देशासह अनेक राज्यांमध्ये पावसाचे चित्र पाहायला मिळत आहे,


अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि देशाच्या विविध भागात गडगडाटासह पावसाची स्थिती आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील विविध ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात थंडी पडण्यास सुरू झाली असून नोव्हेंबरच्या शेवटी थंडीचा जोर वाढेल.



अनेक ठिकाणी पावसाची शक्यता


राज्यात काही दिवसांपासून बऱ्याच भागांमध्ये पाऊस बरसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील २४ तासांत राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.


हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाच्या सरी कोसळू शकतात. यातच मुंबई, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टीवरील परिसरात काही ठिकाणी रविवारी थोडासा पाऊस झाला तर काही ठिकाणी पावसाचे ढग आले होते. दरम्यान, दुपारी या ठिकाणी ऊन पडले होते.



पावसाने वाढवली थंडी


भारतीय हवामान विभागानुसार देशातील काही भागांमध्ये पाऊस तसेच वेगवान वाऱ्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालय क्षेत्रात हिमवर्षाव झाला. देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा प्रकोप वाढायला लागला आहे. दिल्लीतही तापमान घट पाहायला मिळाली तसेच थंडीही वाढू लागली आहे.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत