Maharashtra Weather: राज्यात कसे असणार हवामान, पावसाबाबत IMD दिले हे अपडेट

Share

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. देशासह अनेक राज्यांमध्ये पावसाचे चित्र पाहायला मिळत आहे,

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि देशाच्या विविध भागात गडगडाटासह पावसाची स्थिती आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील विविध ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात थंडी पडण्यास सुरू झाली असून नोव्हेंबरच्या शेवटी थंडीचा जोर वाढेल.

अनेक ठिकाणी पावसाची शक्यता

राज्यात काही दिवसांपासून बऱ्याच भागांमध्ये पाऊस बरसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील २४ तासांत राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाच्या सरी कोसळू शकतात. यातच मुंबई, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टीवरील परिसरात काही ठिकाणी रविवारी थोडासा पाऊस झाला तर काही ठिकाणी पावसाचे ढग आले होते. दरम्यान, दुपारी या ठिकाणी ऊन पडले होते.

पावसाने वाढवली थंडी

भारतीय हवामान विभागानुसार देशातील काही भागांमध्ये पाऊस तसेच वेगवान वाऱ्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालय क्षेत्रात हिमवर्षाव झाला. देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा प्रकोप वाढायला लागला आहे. दिल्लीतही तापमान घट पाहायला मिळाली तसेच थंडीही वाढू लागली आहे.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

17 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

45 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago