मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून उडी मारून आकाश सिंग या २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तो मुंबईच्या परळ परिसरातील रहिवासी असून एका खासगी बँकेत नोकरी करत होता. घटनेच्या दिवशी तो टॅक्सीने कार्यालयातून घरी जात होता. यावेळी त्याने वांद्रे-वरळी सी लिंकवरून जात असताना टॅक्सी थांबवली आणि पुलावरून थेट समुद्रात उडी मारली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
शुक्रवारी रात्री आकाशने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सहून परळला जाण्यासाठी टॅक्सी बूक केली. यानंतर त्याने चालकाला वांद्रे-वरळी सी लिंकवर नेण्यास सांगितले. पुलावरून जात असताना आकाश सिंग फोनवर बोलत होता. यावेळी त्याने अचानक चालकाला सांगितले की कारमधून फोन बाहेर पडला आहे. यामुळे चालकाने सी लिंकवर कार थांबवली. यानंतर आकाशने कारमधून खाली उतरत थेट समुद्रात उडी मारल्याची माहिती वाहन चालकाने दिल्याचे वरळी पोलिसांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव पथकाने रात्री उशिरा आकाशचा मृतदेह बाहेर काढला. त्याने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. प्राथमिक तपासानुसार, आकाशचे तीन महिन्यांपूर्वी प्रेयसीबरोबर ब्रेकअप झाले होते.
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…