बंगळुरू: टीम इंडियाने(team india) विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) नेदरलँड्सविरुद्ध जबरदस्त खेळ करताना सलग नववा सामना जिंकत दिवाळीला मोठे गिफ्ट दिले आहे. टीम इंडियाने हा सामना तब्बल १६० धावांनी जिंकला. टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ बाद ४१० धावा केल्या. त्यानंतर नेदरलँड्सचा संघ २५० धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
सेमीफायनलमध्ये भारत आता न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळणार आहे. १५ नोव्हेंबरला हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार आहे. टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीसाठी उथरलेल्या भारतीय संघाने चार बाद ४१० इतका मोठा स्कोर उभा केला. भारतीय संघाच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केल्या. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी अर्धशतके ठोकली.
श्रेयसने ९४ बॉलमध्ये नाबाद १२८ धावा केल्या. यात त्याने १० चौकार आणि पाच षटकार सामील होते. केएल राहुलने ११ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६४ बॉलमध्ये १०२ धावांची खेळी केली. राहुल आणि श्रेयस अय्यरने चौथ्या विकेटसाठी २०८ धावांची भागीदारी केली.
भारताकडून आज ९ गोलंदाजांना संधी देण्यात आली. यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…
मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…
पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…