World cup 2023: भारताने नेदरलँड्सविरुद्ध साजरी केली विजयाची दिवाळी

बंगळुरू: टीम इंडियाने(team india) विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) नेदरलँड्सविरुद्ध जबरदस्त खेळ करताना सलग नववा सामना जिंकत दिवाळीला मोठे गिफ्ट दिले आहे. टीम इंडियाने हा सामना तब्बल १६० धावांनी जिंकला. टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ बाद ४१० धावा केल्या. त्यानंतर नेदरलँड्सचा संघ २५० धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.


सेमीफायनलमध्ये भारत आता न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळणार आहे. १५ नोव्हेंबरला हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार आहे. टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीसाठी उथरलेल्या भारतीय संघाने चार बाद ४१० इतका मोठा स्कोर उभा केला. भारतीय संघाच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केल्या. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी अर्धशतके ठोकली.


श्रेयसने ९४ बॉलमध्ये नाबाद १२८ धावा केल्या. यात त्याने १० चौकार आणि पाच षटकार सामील होते. केएल राहुलने ११ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६४ बॉलमध्ये १०२ धावांची खेळी केली. राहुल आणि श्रेयस अय्यरने चौथ्या विकेटसाठी २०८ धावांची भागीदारी केली.


भारताकडून आज ९ गोलंदाजांना संधी देण्यात आली. यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

Comments
Add Comment

कुलदीप यादवने दिल्लीमध्ये केले नको ते शतक, बनवला हा खराब रेकॉर्ड

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

भारताला जिंकण्यासाठी हव्या १२१ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला

वर्ल्डकपमध्ये दोन पराभव, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? जाणून घ्या समीकरण

मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. या

IND vs AUS: ३३० धावा करूनही भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ३ गडी राखून पराभव, कर्णधार एलिसा हीलीचे विक्रमी शतक

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील एका अत्यंत रोमहर्षक आणि हाय-स्कोअरिंग सामन्यात, भारतीय महिला