Babar Azam: विश्वचषकातील पाकिस्तानच्या कामगिरीनंतर कर्णधारपद सोडणार बाबर?

मुंबई: पाकिस्तानचा(pakistan)3 संघ विश्वचषक २०२३मधून(world cup 2023) बाहेर जाला आहे. सेमीफायनलमध्ये खेळण्याच्या त्यांच्या आशा शनिवारी इंग्लंडविरुद्ध टॉस हरण्यासोबतच संपल्या होत्या. पाकिस्तानच्या संघाला ९ सामन्यात आज ४ विजयांसह मायदेशी परतत आहेत.


या स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाने सुरूवातीचे दोन सामने जिंकत चांगली सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर त्यांची ट्रेन रूळावरून घसरली. या स्पर्धेत जेव्हा पाकिस्तानने एकामागोमाग एक सामने गमावले जेव्हा बाबरच्या हातून कर्णधारपद जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता जेव्हा पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हानच संपले आहे त्यामुळे सर्वाधिक चर्चा संघाच्या नेतृत्व परिवर्तनाची होत आहे.



बाबर स्वत: कर्णधारपद सोडणार नाही


पीटीआयशी बोलाताना पीसीबीच्या एका सूत्रांनी सांगितले, बाबरने याआधी आपल्या सहकारी खेळाडूंशी बातचीत केली आहे. अनेक खेळाडूंनी त्याला स्वत:हून पद न सोडण्याचा सल्ला दिला आहे. विश्वचषकात सेमीफायनलमध्ये जागा बनवू न शकल्याने संघासोबत माघारी परतण्याने निश्चितच बाबरवर कारवाई होऊ शकते. मात्र तो स्वत: कर्णधारपद सोडणार नाही.



२०१९मध्ये कर्णधार बाबर बनला होता कर्णधार


बाबरने २०१९मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर पाकिस्तानच्या वनडे संघाची कमान सांभाळली होती. त्याला सरफराज खानच्या जागी रिप्लेस करण्यात आले होते. यानंतर २०२१मध्ये त्याला कसोटी कर्णधारपद मिळाले. टी-२० वर्ल्डकप २०२२मध्ये त्याने आपल्या संघाला फायनलपर्यंत पोहोचवले होते.

Comments
Add Comment

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट