Sri Lanka Cricket : आयसीसीने वर्ल्डकपदरम्यान श्रीलंका बोर्डाला केले निलंबित, सांगितले कारण

  82

मुंबई: क्रिकेटची मोठी संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल(icc) म्हणजेच आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला(srilanka cricket board) तत्कालीन प्रभावाने निलंबित केले आहे. हा निर्णय खूपच महत्त्वाचा आहे, कारण आता विश्वचषकातील सामने सुरू आहेत. या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाची कामगिरी चांगली जाली नाही.


खराब कामगिरीनंतर श्रीलंकेच्या सरकारने संपूर्ण मंडळ बरखास्त केले होते. यानंतर राष्ट्रपतींनी तपासासाठी आपल्याकडून खास कमिटी बनवली होती. आयसीसीने याला सरकारकडून मंडळाच्या कामकाजात दखल केल्याचे म्हटले आहे. या कारणामुळेच त्यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. श्रीलंकेच्या संघाला विश्वचषकात अफगाणिस्तानकडूनही पराभव सहन करावा लागला होता.


क्रिकइन्फोच्या माहितीनुसार आयसीसीने सांगितले आज आमच्या बोर्डाने बैठकीनंतर निर्णय घेतला की श्रीलंका क्रिकेट एक सदस्याच्या रूपात आपल्या दायित्वाचे गंभीररित्या उल्लंघन करत आहे. श्रीलंकेच्या बोर्डाला ही ग्वाही द्यावी लागेल की त्यांच्या कामाकाजात सरकारकडून कोणताही हस्तक्षेप असता कामा नये. दरम्यान, निलंबनासाठी कोणत्या अटी घालण्यात आल्या आहेत यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार