Mumbai Accident : मुंबईत मोठा अपघात, वेगवान कारची ६ वाहनांना धडक, ३ जणांचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरील(bandra worli sea link) टोल प्लाझावर गुरुवारी रात्री मोठा अपघात(accident) घडला. या ठिकाणी एका वेगवान कारने ६ गाड्यांना टक्कर दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गुरूवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सी लिंकवरील टोल प्लाझापासून १०० मीटर अंतरावर हे घडले.


रात्रीच्या वेळेस वांद्रेच्या दिशेने जाणारी एक अत्यंत वेगवान कारची अनेक गाड्यांना धडक बसल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. सुरूवातीला धडक बसल्यानंतर कारचा वेग अधिक वाढला आणि तिने प्लाझावर उभ्या असलेल्या गाड्यांना टक्कर दिली.


 


गुरूवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास एक इनोव्हा गाडी वरळी येथून वांद्रेच्या दिशेने नॉर्थ बाऊंडला जात होते. तेव्हा टोल प्लाझावर १०० मीटर अंतरावर तिने गाड्यांना धडक दिली. सी लिंकवरील मर्सिडिज गाडीला डॅश मारल्यानंतर या गाडीने वेग वाढवला आणि लवकर निघून जाण्याच्या घाईत आणखी काही गाड्यांना धडक मारली.


इनोव्हा गाडीत ड्रायव्हरसह सात लोक बसले होते. या संपूर्ण घटनेत मर्सिडीज आणि टक्कर मारणारी गाडी इनोव्हासह ६ वाहनांचा अपघात झाला. यात ९ जण जखमी झाले. ज्यात ३ जणांची प्रकृती गंभीर होती. त्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यात २ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. बाकी ८ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील २ जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. या दोघांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर बाकी लोकांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, धडक देणाऱ्या इनोव्हाच्या ड्रायव्हरवरही भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही घटना अतिशय गंभीर आणि यावर कारवाई केली जाईल.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.