Mumbai Accident : मुंबईत मोठा अपघात, वेगवान कारची ६ वाहनांना धडक, ३ जणांचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरील(bandra worli sea link) टोल प्लाझावर गुरुवारी रात्री मोठा अपघात(accident) घडला. या ठिकाणी एका वेगवान कारने ६ गाड्यांना टक्कर दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गुरूवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सी लिंकवरील टोल प्लाझापासून १०० मीटर अंतरावर हे घडले.


रात्रीच्या वेळेस वांद्रेच्या दिशेने जाणारी एक अत्यंत वेगवान कारची अनेक गाड्यांना धडक बसल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. सुरूवातीला धडक बसल्यानंतर कारचा वेग अधिक वाढला आणि तिने प्लाझावर उभ्या असलेल्या गाड्यांना टक्कर दिली.


 


गुरूवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास एक इनोव्हा गाडी वरळी येथून वांद्रेच्या दिशेने नॉर्थ बाऊंडला जात होते. तेव्हा टोल प्लाझावर १०० मीटर अंतरावर तिने गाड्यांना धडक दिली. सी लिंकवरील मर्सिडिज गाडीला डॅश मारल्यानंतर या गाडीने वेग वाढवला आणि लवकर निघून जाण्याच्या घाईत आणखी काही गाड्यांना धडक मारली.


इनोव्हा गाडीत ड्रायव्हरसह सात लोक बसले होते. या संपूर्ण घटनेत मर्सिडीज आणि टक्कर मारणारी गाडी इनोव्हासह ६ वाहनांचा अपघात झाला. यात ९ जण जखमी झाले. ज्यात ३ जणांची प्रकृती गंभीर होती. त्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यात २ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. बाकी ८ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील २ जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. या दोघांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर बाकी लोकांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, धडक देणाऱ्या इनोव्हाच्या ड्रायव्हरवरही भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही घटना अतिशय गंभीर आणि यावर कारवाई केली जाईल.

Comments
Add Comment

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले