Mumbai Accident : मुंबईत मोठा अपघात, वेगवान कारची ६ वाहनांना धडक, ३ जणांचा मृत्यू

  175

मुंबई: मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरील(bandra worli sea link) टोल प्लाझावर गुरुवारी रात्री मोठा अपघात(accident) घडला. या ठिकाणी एका वेगवान कारने ६ गाड्यांना टक्कर दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गुरूवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सी लिंकवरील टोल प्लाझापासून १०० मीटर अंतरावर हे घडले.


रात्रीच्या वेळेस वांद्रेच्या दिशेने जाणारी एक अत्यंत वेगवान कारची अनेक गाड्यांना धडक बसल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. सुरूवातीला धडक बसल्यानंतर कारचा वेग अधिक वाढला आणि तिने प्लाझावर उभ्या असलेल्या गाड्यांना टक्कर दिली.


 


गुरूवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास एक इनोव्हा गाडी वरळी येथून वांद्रेच्या दिशेने नॉर्थ बाऊंडला जात होते. तेव्हा टोल प्लाझावर १०० मीटर अंतरावर तिने गाड्यांना धडक दिली. सी लिंकवरील मर्सिडिज गाडीला डॅश मारल्यानंतर या गाडीने वेग वाढवला आणि लवकर निघून जाण्याच्या घाईत आणखी काही गाड्यांना धडक मारली.


इनोव्हा गाडीत ड्रायव्हरसह सात लोक बसले होते. या संपूर्ण घटनेत मर्सिडीज आणि टक्कर मारणारी गाडी इनोव्हासह ६ वाहनांचा अपघात झाला. यात ९ जण जखमी झाले. ज्यात ३ जणांची प्रकृती गंभीर होती. त्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यात २ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. बाकी ८ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील २ जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. या दोघांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर बाकी लोकांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, धडक देणाऱ्या इनोव्हाच्या ड्रायव्हरवरही भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही घटना अतिशय गंभीर आणि यावर कारवाई केली जाईल.

Comments
Add Comment

Pratap Sranaik : "वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्थेत बदल करणार" प्रताप सरनाईक यांनी दिले आदेश...

मुंबई : रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये  पार्किंग व्यवस्था

Kolhapuri Chappal Controversy : प्राडाच्या फॅशन रॅम्पवर कोल्हापुरी चप्पलचा रुबाब! तर, इटालियन 'प्राडा'वर चोरीचा आरोप... काय आहे नेमकं प्रकरण?

'भारताला श्रेय नाही'... नेटिझन्स पेटले मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इटलीच्या एका फॅशन शोची जबरदस्त चर्चा

कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने होणार...

मुंबई : मुंबईकरांची  वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे. 

Hide Tide Alert: विक्रमी पावसानंतर मुंबईत भरतीचा इशारा, मुंबईच्या चौपाट्यांवर न जाण्याचे आवाहन

आज समुद्र खवळणार मुंबईत हाय टाइड अलर्ट जारी जूनच्या अखेरीस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान

Bus Strike : 'पालकांनो लक्ष द्या', मुलांच्या शाळेची बस न येण्याची शक्यता! विविध मागण्यांसाठी खाजगी बस चालकांचा १ जुलैपासून बेमुदत संप

स्कूल बस सेवांवरही होणार परिणाम मुंबई : मुंबईतील खाजगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर

‘१०० मिमीपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा आराखडा तयार करा’

केंद्र सरकारकडून मुंबईला स्वतंत्र निधी मिळणार मुंबई : मुंबईची सध्याची पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ५५