Mumbai Accident : मुंबईत मोठा अपघात, वेगवान कारची ६ वाहनांना धडक, ३ जणांचा मृत्यू

  181

मुंबई: मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरील(bandra worli sea link) टोल प्लाझावर गुरुवारी रात्री मोठा अपघात(accident) घडला. या ठिकाणी एका वेगवान कारने ६ गाड्यांना टक्कर दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गुरूवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सी लिंकवरील टोल प्लाझापासून १०० मीटर अंतरावर हे घडले.


रात्रीच्या वेळेस वांद्रेच्या दिशेने जाणारी एक अत्यंत वेगवान कारची अनेक गाड्यांना धडक बसल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. सुरूवातीला धडक बसल्यानंतर कारचा वेग अधिक वाढला आणि तिने प्लाझावर उभ्या असलेल्या गाड्यांना टक्कर दिली.


 


गुरूवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास एक इनोव्हा गाडी वरळी येथून वांद्रेच्या दिशेने नॉर्थ बाऊंडला जात होते. तेव्हा टोल प्लाझावर १०० मीटर अंतरावर तिने गाड्यांना धडक दिली. सी लिंकवरील मर्सिडिज गाडीला डॅश मारल्यानंतर या गाडीने वेग वाढवला आणि लवकर निघून जाण्याच्या घाईत आणखी काही गाड्यांना धडक मारली.


इनोव्हा गाडीत ड्रायव्हरसह सात लोक बसले होते. या संपूर्ण घटनेत मर्सिडीज आणि टक्कर मारणारी गाडी इनोव्हासह ६ वाहनांचा अपघात झाला. यात ९ जण जखमी झाले. ज्यात ३ जणांची प्रकृती गंभीर होती. त्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यात २ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. बाकी ८ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील २ जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. या दोघांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर बाकी लोकांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, धडक देणाऱ्या इनोव्हाच्या ड्रायव्हरवरही भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही घटना अतिशय गंभीर आणि यावर कारवाई केली जाईल.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड