Bandra-Worli sea link accident : वरळी सीलिंकवर भाजप नेत्याला मारण्याचा प्रयत्न

भीषण अपघातात वेगवान कारने दिली ६ गाड्यांना धडक; तिघांचा मृत्यू तर ९ जण जखमी 


मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सीलिंकवर काल रात्री १० च्या सुमारास एक भीषण अपघात (Bandra-Worli sea link accident) घडला. टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या गाड्यांना मागून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत.

इनोव्हा (Innova) या वेगवान गाडीने टोल प्लाझावर १०० मीटर अंतरावर गाड्यांना धडक दिली. सी लिंकवरील मर्सिडीज (Mercedes) गाडीला डॅश मारल्यानंतर या गाडीने वेग वाढवला आणि लवकर निघून जाण्याच्या घाईत आणखी काही गाड्यांना धडक मारली. इनोव्हा गाडीत ड्रायव्हरसह सात लोक बसले होते. सध्या ड्रायव्हर जखमी असून त्याच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपचार झाल्यावर त्याची चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान, वरळी सी लिंकवरील अपघातावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले भाजपा नेता जितेंद्र चौधरी (Jitendra Choudhary) यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी या कार चालकाने सी लिंकवर आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता असा दावा केला आहे. एका कार्यक्रमातून परतत असताना सी लिंकवर मागून आलेल्या कारने आपल्या कारला टक्कर मारली होती. मी ज्या बाजूला बसलो होतो त्याच बाजूला कारने टक्कर मारली. परंतु, आपली कार समुद्रात पडण्यापासून वाचली, असा दावा त्यांनी केला.

यानंतर ही कार त्याच वेगाने टोल नाक्याच्या दिशेने गेली. टोल नाक्यावर गाड्या उभ्या असतील याचा त्याला अंदाज नसावा. यामुळे त्याने तेथील गाड्यांना टक्कर मारली. तो ड्रायव्हर पाकिस्तानी भाषेत बोलत होता, असा दावा चौधरी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे या घटनेला नेमकं काय वळण मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने