Watch: घड्याळ नेहमी डाव्या हातातच का बांधले जाते? जाणून घ्या याचे उत्तर

मुंबई: घड्याळ(watch) हे नेहमी डाव्या हातातच बांधले जाते. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे. लोक अनेक वर्षांपासून असेच घालत आहेत की त्यामागेही काही कारण आहे? सोशल मीडियावर हा प्रश्न विचारण्यात आला. यावर अनेक युजर्सनी वेगवेगळी उत्तरे दिली. मात्र तुम्हाला यामागचे शास्त्रीय कारण माहीत आहे का?


पहिली गोष्ट म्हणजे अधिकतर लोक आपल्या उजव्या हाताने काम करतात. त्यामुळे हा हात सतत व्यस्त असतो. अशातच डाव्या हातात घड्याळ बांधल्याने सतत वेळ बघण्यास त्रास होत नाही. डाव्या हातावर घड्याळ बांधल्याने ते सुरक्षित राहते. तसेच पडण्याचाही धोका नसतो. हेच कारण लक्षात घेता अनेक कंपन्या डाव्या हातावर बांधण्यासाठी घड्याळ बनवतात.



जाणून घ्या शास्त्रीय कारण


लक्ष देऊन पाहिल्यास टेबलावरील घड्याळ नेहमी सरळ असते. स्टँडवर ठेवातचा घड्याळातील १२ हा आकडा नेहमी वर असतो. भिंतीवरही आपण असेच घड्याळ अडकवतो. जर आपण घड्याळ डाव्या हाताऐवजी उजव्या हातावर बांधले तर हा १२ अंक खाली जाईल आणि क्रम उलटा होईल.


अशातच तुम्हाला घड्याळाचे वाचन कऱणे कठीण होईल. जेव्हा ऑटोमॅटिक घड्याळाचा जमाना होता तेव्हा हे घड्याळ लोक दोन्ही हातांवर बांधत होते. उजव्या हातावर बांधताना चावी बाहेरच्या दिशेला जात होती यामुळे चावी देण्यास त्रास होत असे. दरम्यान, डाव्या हातावर बांधल्यास चावी आतल्या बाजूस यायची. आता तुम्हाला याचे खरे कारण समजले असेल.

Comments
Add Comment

Ajit Pawar Passed Away : 'शरद पवारांचा आधारवड गेला..'; राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच गुरुवारी (दि. २९ जानेवारी) त्यांच्या

अडीच वर्षांच्या संसारावर काळाचा घाला; पिंकी माळी यांचं विमान दुर्घटनेत निधन

मुंबई : विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळी हिचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी काही

महापालिकेत एमआयएमचे महत्व वाढले

सत्ताधारी महायुतीसाठी डोकेदुखी मुंबई :मुंबई महानगरपालिकेत भाजपा शिवसेना महायुतीची सत्ता आली असली तरी, अवघे ८

हवेची गुणवत्ता जाणून घेणे नागरिकांचा मूलभूत अधिकार

प्रदूषणाची आकडेवारी सार्वजनिक संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे निर्देश मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर

Ajit Pawar Passed Away : अजितदादांच्या या 'खास' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?

बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन

अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या पार्थिवावर साताऱ्यात अंत्यसंस्कार

मुंबई : बारामती येथील भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्राण गमावलेले त्यांचे वैयक्तिक