Elvish Yadav : एल्विशला साप पुरवायचा 'तो' हरियाणवी गायक

नोएडा : बिग बॉस (Bigg Boss) विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) सापांची तस्करी करण्याच्या प्रकरणात चांगलाच अडचणीत सापडला आहे. पण याशिवाय आता आणखी एक आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तो रेव्ह पार्टी करत असल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एल्विशने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.


एल्विशवर आरोप दाखल झाल्यानंतर या प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे सांगणारा त्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याची तीन तास चौकशी केली होती. त्या दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या. या चौकशीत आपण नव्हे तर हरियाणवी गायक फाजिलपुरियाने (Fazilpuria) सापांची तस्करी केल्याचा आरोप त्याने केला.


एल्विशच्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये एल्विशच्या हातात एक नव्हे तर दोन साप आणि एक हरियाणवी गायक दिसला होता. यावरुन पोलिसांनी एल्विशला तुझ्याकडे हे साप कुठून आले असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याने हरियाणाच्या त्या गायकाचेच नाव घेतले. हे साप हरियाणवी गायक फाजिलपुरियाचे असल्याचे तो म्हणाला. फाजिलपुरिया या सापांचं नियोजन पाहत होता. त्याला किती सापांची गरज आहे हे सांगितलं तर तो उपलब्ध करुन द्यायचा, असंही एल्विशनं सांगितलं.


एल्विशनं ज्याचं नाव घेतलं तो फाजिलपुरिया हा एक हरियाणवी गायक आहे. तो सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. त्याच्या गाण्यांना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचं दिसून आलं आहे. फाजिलपुरियाचं खरं नाव राहुल यादव असं आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी