Elvish Yadav : एल्विशला साप पुरवायचा 'तो' हरियाणवी गायक

नोएडा : बिग बॉस (Bigg Boss) विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) सापांची तस्करी करण्याच्या प्रकरणात चांगलाच अडचणीत सापडला आहे. पण याशिवाय आता आणखी एक आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तो रेव्ह पार्टी करत असल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एल्विशने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.


एल्विशवर आरोप दाखल झाल्यानंतर या प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे सांगणारा त्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याची तीन तास चौकशी केली होती. त्या दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या. या चौकशीत आपण नव्हे तर हरियाणवी गायक फाजिलपुरियाने (Fazilpuria) सापांची तस्करी केल्याचा आरोप त्याने केला.


एल्विशच्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये एल्विशच्या हातात एक नव्हे तर दोन साप आणि एक हरियाणवी गायक दिसला होता. यावरुन पोलिसांनी एल्विशला तुझ्याकडे हे साप कुठून आले असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याने हरियाणाच्या त्या गायकाचेच नाव घेतले. हे साप हरियाणवी गायक फाजिलपुरियाचे असल्याचे तो म्हणाला. फाजिलपुरिया या सापांचं नियोजन पाहत होता. त्याला किती सापांची गरज आहे हे सांगितलं तर तो उपलब्ध करुन द्यायचा, असंही एल्विशनं सांगितलं.


एल्विशनं ज्याचं नाव घेतलं तो फाजिलपुरिया हा एक हरियाणवी गायक आहे. तो सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. त्याच्या गाण्यांना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचं दिसून आलं आहे. फाजिलपुरियाचं खरं नाव राहुल यादव असं आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने