Elvish Yadav : एल्विशला साप पुरवायचा 'तो' हरियाणवी गायक

नोएडा : बिग बॉस (Bigg Boss) विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) सापांची तस्करी करण्याच्या प्रकरणात चांगलाच अडचणीत सापडला आहे. पण याशिवाय आता आणखी एक आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तो रेव्ह पार्टी करत असल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एल्विशने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.


एल्विशवर आरोप दाखल झाल्यानंतर या प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे सांगणारा त्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याची तीन तास चौकशी केली होती. त्या दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या. या चौकशीत आपण नव्हे तर हरियाणवी गायक फाजिलपुरियाने (Fazilpuria) सापांची तस्करी केल्याचा आरोप त्याने केला.


एल्विशच्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये एल्विशच्या हातात एक नव्हे तर दोन साप आणि एक हरियाणवी गायक दिसला होता. यावरुन पोलिसांनी एल्विशला तुझ्याकडे हे साप कुठून आले असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याने हरियाणाच्या त्या गायकाचेच नाव घेतले. हे साप हरियाणवी गायक फाजिलपुरियाचे असल्याचे तो म्हणाला. फाजिलपुरिया या सापांचं नियोजन पाहत होता. त्याला किती सापांची गरज आहे हे सांगितलं तर तो उपलब्ध करुन द्यायचा, असंही एल्विशनं सांगितलं.


एल्विशनं ज्याचं नाव घेतलं तो फाजिलपुरिया हा एक हरियाणवी गायक आहे. तो सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. त्याच्या गाण्यांना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचं दिसून आलं आहे. फाजिलपुरियाचं खरं नाव राहुल यादव असं आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या