Manoj Jarange : दिवाळीनंतर जरांगे पुन्हा मैदानात उतरणार; १५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रभर दौरे

६ टप्प्यात असणार दौरा


छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीकरता उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. मराठा समाजाने सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत मराठा आरक्षणाचा कोणालाच विसर पडू नये, ती मागणी धगधगतच राहिली पाहिजे यासाठी मनोज जरांगे पुन्हा राज्यभर दौरे करायला उभे राहणार आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गाठी भेटी घेण्यासाठी ते पुन्हा दौरा सुरू करीत आहेत. या दौऱ्याला १५ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे.


मराठा आरक्षणाचा हा तिसरा टप्पा आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगेंनी आपल्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मनोज जरांगे हे १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहेत. एकूण ६ टप्प्यात हा दौरा असणार आहे.


मनोज जरांगे हे दौऱ्यात ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहेत. सोबतच १ डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्याचे स्वरूप देखील सांगितले आहे.


१५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा


१६ नोव्हेंबर रोजी दौंड, मायणी


१७ नोव्हेंबर रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड


१८ नोव्हेंबर रोजी सातारा, मेंढा, वाई, रायगड


१९ नोव्हेंबर रोजी रायगड, राडगड दर्शन, रायगड ते पाचाड दर्शन, मुळशी आंळदी


२० नोव्हेंबर रोजी तुळापुर, पुणे, खराडी, चंदननगर, आंळदी, खालापुर, कल्याण


२१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक त्र्यबंकेश्वर,


२२ नोव्हेंबर रोजी विश्रांतगड, संमगमनेर, श्रीरामपुर


२३ नोव्हेंबर रोजी नेवासा, शेवगाव, बोधेगाव, धोंडराई त्यानंतर आंतरवली.


कोल्हापूर येथून शाहू महाराजांच्या स्मारकापासून या दौऱ्यांची सुरुवात करणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे. हा त्यांच्या दौऱ्याचा तिसरा टप्पा असणार आहे, तर पुढच्या चौथ्या टप्प्यामध्ये आपण राहिलेला मराठवाडा, विदर्भ, कोकण असे ६ टप्प्यात दौरे करणार असल्याची माहिती यावेळी जरांगे यांनी दिली.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या