Good News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात, सरकारकडून खुशखबर

मुंबई: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी(state government employee) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या तोंडावर आनंदाची बातमी आणली आहे. राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.


याआधी काही महिन्यांपूर्वी सरकारने या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा २ टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात असल्याचे दिसत आहे.


बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्के इतका झाला होता. आता शिंदे सरकराकडून यात आणखी २ टक्क्यांची वाढ केली जाणार आहे.


याआधी जून महिन्यामध्ये सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यानुसार ४२ टक्के महागाई भत्ता झाला होता. त्यानंतर आता २ टक्क्यांची वाढ होणार असून हा भत्ता ४४ टक्के होणार आह. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.


सरकारकडून वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते. याआधी जूनमध्ये ही वाढ करण्यात आली होती. दरम्यान, केंद्र सरकारकडूनही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता ४६ टक्के इतका झाला आहे.
Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना