Good News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात, सरकारकडून खुशखबर

  830

मुंबई: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी(state government employee) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या तोंडावर आनंदाची बातमी आणली आहे. राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.


याआधी काही महिन्यांपूर्वी सरकारने या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा २ टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात असल्याचे दिसत आहे.


बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्के इतका झाला होता. आता शिंदे सरकराकडून यात आणखी २ टक्क्यांची वाढ केली जाणार आहे.


याआधी जून महिन्यामध्ये सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यानुसार ४२ टक्के महागाई भत्ता झाला होता. त्यानंतर आता २ टक्क्यांची वाढ होणार असून हा भत्ता ४४ टक्के होणार आह. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.


सरकारकडून वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते. याआधी जूनमध्ये ही वाढ करण्यात आली होती. दरम्यान, केंद्र सरकारकडूनही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता ४६ टक्के इतका झाला आहे.
Comments
Add Comment

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक