Good News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात, सरकारकडून खुशखबर

मुंबई: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी(state government employee) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या तोंडावर आनंदाची बातमी आणली आहे. राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.


याआधी काही महिन्यांपूर्वी सरकारने या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा २ टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात असल्याचे दिसत आहे.


बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्के इतका झाला होता. आता शिंदे सरकराकडून यात आणखी २ टक्क्यांची वाढ केली जाणार आहे.


याआधी जून महिन्यामध्ये सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यानुसार ४२ टक्के महागाई भत्ता झाला होता. त्यानंतर आता २ टक्क्यांची वाढ होणार असून हा भत्ता ४४ टक्के होणार आह. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.


सरकारकडून वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते. याआधी जूनमध्ये ही वाढ करण्यात आली होती. दरम्यान, केंद्र सरकारकडूनही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता ४६ टक्के इतका झाला आहे.
Comments
Add Comment

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत

राज्यातील शाळांमध्ये ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’द्वारे हवामान शिक्षण मिळणार

मुंबई : पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने

धक्कादायक! १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल...

सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय