चहा-बिस्किट दिले नाही म्हणून डॉक्टर भडकला, शस्त्रक्रिया न करताच निघून गेला

  138

कारवाईच्या भीतीने आता शुगर असल्याची सारवासारव


नागपूर : नागपुरातील (Nagpur) जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरने वेळेत चहा-बिस्कीट न मिळाल्यामुळे तो चक्क शस्त्रक्रिया सोडून आरोग्य केंद्रातून निघून गेल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे, ऑपरेशनची सर्व तयारी झाली होती, तसेच, रुग्णांना अॅनेस्थिशिया सुद्धा देण्यात आला होता. डॉक्टरच्या या कृत्याने रुग्णाच्या नातेवाईकांसह नागपुरकरांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.


नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात चार महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार सर्व तयारी करण्यात आली होती. रुग्णांना अॅनेस्थिशिया सुद्धा दिला होता. डॉक्टर आरोग्य केंद्रात वेळेवर आले होते. पण त्यांना वेळेत चहा बिस्कीट मिळाले नाही म्हणून डॉक्टरांना राग अनावर झाला आणि ते आरोग्य केंद्रातून तडकाफडकी निघून गेले.


प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दुसऱ्या डॉक्टरची व्यवस्था करून नियोजित शस्त्रक्रिया केल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.


मात्र पहिल्या डॉक्टरच्या कृत्याचा नाहक त्रास चारही महिला रुग्णांना सहन करावा लागला. शुक्रवारी (३ ऑक्टोबर) ही धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी कुंदा राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.


दरम्यान, दोषी डॉक्टर भलावी यांना शुगरचा त्रास असल्याने त्यांना चहा बिस्कीटची गरज होती. त्यामुळे वेळेत चहा बिस्कीट न मिळाल्याने ते तिथून निघून गेल्याचे चौकशी दरम्यान डॉ. भलावी यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या