चहा-बिस्किट दिले नाही म्हणून डॉक्टर भडकला, शस्त्रक्रिया न करताच निघून गेला

कारवाईच्या भीतीने आता शुगर असल्याची सारवासारव


नागपूर : नागपुरातील (Nagpur) जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरने वेळेत चहा-बिस्कीट न मिळाल्यामुळे तो चक्क शस्त्रक्रिया सोडून आरोग्य केंद्रातून निघून गेल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे, ऑपरेशनची सर्व तयारी झाली होती, तसेच, रुग्णांना अॅनेस्थिशिया सुद्धा देण्यात आला होता. डॉक्टरच्या या कृत्याने रुग्णाच्या नातेवाईकांसह नागपुरकरांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.


नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात चार महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार सर्व तयारी करण्यात आली होती. रुग्णांना अॅनेस्थिशिया सुद्धा दिला होता. डॉक्टर आरोग्य केंद्रात वेळेवर आले होते. पण त्यांना वेळेत चहा बिस्कीट मिळाले नाही म्हणून डॉक्टरांना राग अनावर झाला आणि ते आरोग्य केंद्रातून तडकाफडकी निघून गेले.


प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दुसऱ्या डॉक्टरची व्यवस्था करून नियोजित शस्त्रक्रिया केल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.


मात्र पहिल्या डॉक्टरच्या कृत्याचा नाहक त्रास चारही महिला रुग्णांना सहन करावा लागला. शुक्रवारी (३ ऑक्टोबर) ही धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी कुंदा राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.


दरम्यान, दोषी डॉक्टर भलावी यांना शुगरचा त्रास असल्याने त्यांना चहा बिस्कीटची गरज होती. त्यामुळे वेळेत चहा बिस्कीट न मिळाल्याने ते तिथून निघून गेल्याचे चौकशी दरम्यान डॉ. भलावी यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास