Bhaubeej Muhurt 2023 : यंदाच्या दिवाळीत भावाला कोणत्या वेळी ओवाळाल? जाणून घ्या भाऊबीजेचा मुहूर्त...

हिंदू सणांमध्ये (Hindu Festivals) सांस्कृतिक महत्त्व असलेला दिवाळीचा सण (Diwali Festival) अवघ्या चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीची शॉपिंग (Diwali Shopping) करण्यासाठी ठिकठिकाणचे बाजार गर्दीने ओसंडून वाहत आहेत. कंदील, पणत्या, रांगोळी, फराळ, दिवे, नवे कपडे यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. सगळीकडे दिवाळीची लगबग सुरु आहे. यंदाच्या वर्षी प्रदूषणाने कळस गाठल्याने बाजारातही फटाक्यांची आवक काही प्रमाणात कमी आहे, ही चांगली बाब आहे.


याच दिवाळीतील भाऊ बहिणीच्या नात्याचं महत्त्व सांगणारा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज (Bhaubeej). यादिवशी बहीण भावाला ओवाळते आणि दोघंही एकमेकांना छान भेटवस्तू देतात. भावाबहिणीने एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र, यंदाच्या वर्षी भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त कोणता?


भाऊबीजचा सण कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा सण १५ नोव्हेंबरला बुधवारी साजरा केला जाईल. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची दुसरी तिथी ही मंगळवारी १४ नोव्हेंबरला दुपारी २ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होईल, ती दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबरला बुधवारी दुपारी १ वाजून ४७ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे, या परिस्थितीमध्ये तिथीनुसार १५ नोव्हेंबरला भाऊबीजचा सण साजरा केला जाईल.


भाऊबीजेचा शुभ मुहूर्त हा १५ नोव्हेंबरला दुपारी १ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. या शुभ मुहूर्तावर तुम्ही भाऊबीज साजरी करू शकता.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Travel Outfits : प्रवासात कम्फर्ट आणि स्टाइल दोन्ही हवे? ट्राय करा हे ८ ट्रेंडी आउटफिट्स

लांबचा प्रवास असो किंवा विकेंड ट्रिप, स्टायलिश दिसतानाच आरामदायी कपडे घालणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य

Water Worship : तब्बल चार वर्षानंतर महापौरांच्या हस्ते गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलपूजन

नाशिक : नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर गंगापूर धरणातील जलपूजनाचा

Special Intensive Revision : विशेष सखोल पुनरिक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात चिपळूण राज्यात प्रथम

रत्नागिरी : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातील ‘२६५ –

Ladoo : राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; सत्य घटनेवर आधारित 'लाडू' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीत तब्बल २५ वर्षांचा सुवर्णकाळ गाजवणारे, ७२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका