World Cup 2023: बर्थडेच्या दिवशी विराट कोहलीचे दमदार शतक, सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी

कोलकाता: विराट कोहली(virat kohli) आज आपला ३५वा वाढदिवस साजरा आहे. या निमित्त त्याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. हा रेकॉर्ड त्याने विश्वचषकात केल्याने त्याचे महत्त्व खास आहे. विराट कोहलीने आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये चार वेळा विश्वचषक खेळला आहे. त्याचा पहिला विश्वचषक २०११मध्ये होता.


भारत चॅम्पियन ठरला होता. यानंतर विराट २०१५, २०१९ आणि २०२३मध्येही विश्वचषक खेळला आहे. अशातच गेल्या तीन विश्वचषकात विराट कोहलीने कधीही ५०० धावा केल्या नव्हत्या. मात्र यावेळी विराट कोहली जबरदस्त फॉर्मात असल्याने भरपूर धावा करत आहे.



विश्वचषकात दुसरा सर्वाधिक धावा कऱणारा खेळाडू ठरला विराट


त्याने ऑस्ट्रेलियाविरद्ध पहिल्या सामन्यापासून धावा करण्यास सुरूवात केली आणि आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या आठव्या सामन्यातही कोहलीची बॅट काही थांबण्यास तयार नाही. विराटने या दरम्यान २ शतक आणि ४ अर्धशतके ठोकली आहेत.


कोहलीने या विश्वचषकातील आपले दुसरे आणि आंतरराष्ट्रीय वनडे करिअरमधील ४९वे शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साजरे केले. भारतीय संघांचा आज आठवा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला जात आहे.


या सामन्यात विराट कोहलीने ४९वे एकदिवसीय शतक ठोकताना विश्व क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकदिवसीय शतके ठोकण्याचा सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या एकदिवसीय करिअरमध्ये ४९ शतक ठोकले होते. जगातील कोणत्याही फलंदाजांने ही कामगिरी केली होती. आता विराटने सचिनच्या एका रेकॉर्डशी बरोबरी करणारा फलंदाज ठरला आहे.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे