World Cup 2023: बर्थडेच्या दिवशी विराट कोहलीचे दमदार शतक, सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी

कोलकाता: विराट कोहली(virat kohli) आज आपला ३५वा वाढदिवस साजरा आहे. या निमित्त त्याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. हा रेकॉर्ड त्याने विश्वचषकात केल्याने त्याचे महत्त्व खास आहे. विराट कोहलीने आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये चार वेळा विश्वचषक खेळला आहे. त्याचा पहिला विश्वचषक २०११मध्ये होता.


भारत चॅम्पियन ठरला होता. यानंतर विराट २०१५, २०१९ आणि २०२३मध्येही विश्वचषक खेळला आहे. अशातच गेल्या तीन विश्वचषकात विराट कोहलीने कधीही ५०० धावा केल्या नव्हत्या. मात्र यावेळी विराट कोहली जबरदस्त फॉर्मात असल्याने भरपूर धावा करत आहे.



विश्वचषकात दुसरा सर्वाधिक धावा कऱणारा खेळाडू ठरला विराट


त्याने ऑस्ट्रेलियाविरद्ध पहिल्या सामन्यापासून धावा करण्यास सुरूवात केली आणि आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या आठव्या सामन्यातही कोहलीची बॅट काही थांबण्यास तयार नाही. विराटने या दरम्यान २ शतक आणि ४ अर्धशतके ठोकली आहेत.


कोहलीने या विश्वचषकातील आपले दुसरे आणि आंतरराष्ट्रीय वनडे करिअरमधील ४९वे शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साजरे केले. भारतीय संघांचा आज आठवा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला जात आहे.


या सामन्यात विराट कोहलीने ४९वे एकदिवसीय शतक ठोकताना विश्व क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकदिवसीय शतके ठोकण्याचा सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या एकदिवसीय करिअरमध्ये ४९ शतक ठोकले होते. जगातील कोणत्याही फलंदाजांने ही कामगिरी केली होती. आता विराटने सचिनच्या एका रेकॉर्डशी बरोबरी करणारा फलंदाज ठरला आहे.

Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी