Chinmay Mandlekar : रंगभूमी दिनानिमित्त चिन्मय मांडलेकरने नाट्यरसिकांना दिली 'ही' खास भेट

गेल्या अनेक दिवसांपासून होती उत्सुकता...


मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा आणि अष्टपैलू अभिनेता अशी चिन्मय मांडलेकरची (Chinmay Mandlekar) ओळख आहे. आजवर त्याने अनेक मालिका व सिनेमांमधून आपल्या उत्तम अभिनयाने स्वतःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मात्र, चिन्मय आणि रंगभूमीचं विशेष नातं आहे. नाटकांतूनच घडलेला चिन्मय आजही रंगभूमीवर अनेक नवनवीन प्रयोग करण्यात सक्रिय असतो. आजच्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त (Marathi Rangbhumi Din) देखील त्याने नाट्यरसिकांसाठी एक खास भेट आणली आहे.


चिन्मय मांडलेकर लिखित दिग्दर्शित 'गालिब' (Galib) हे नवंकोरं नाटक आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आहे. आज शुभारंभाचा प्रयोग गडकरी रंगायतन (Gadkari Rangaytan), ठाणे येथे पार पडणार आहे. 'माझा होशील ना?' या मालिकेतून घराघरात पोहोचलेले गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) आणि विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) या नाटकामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच अश्विनी जोशी आणि गुरुराज अवधानी हे कलाकार देखील गालिब नाटकात दिसणार आहेत.





चिन्मयने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन गालिब या नाटकाच्या प्रयोगाची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं होतं की, 'तुझ्या डोळ्यात मांजराची धिटाई आणि हरणाचं बावरलेपण दोन्ही आहे, मराठी रंगभूमी दिनी , अर्थात ५ नोव्हेंबरला येत आहे नवीन नाटक-गालिब'. तेव्हापासूनच नाट्यरसिकांना या नाटकाबद्दल उत्सुकता लागून राहिली होती.





गालिब या नाटकाचे पुढील पाच प्रयोगदेखील जाहीर झाले आहेत. या नाटकाचा दुसरा व तिसरा प्रयोग पुण्यात रंगणार आहे. तर पुढील तीन प्रयोग मुंबईत होणार आहेत.



पुण्यातील प्रयोग -


शनिवार ११ नोव्हेंबर दु. १२:३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
शनिवार ११ नोव्हेंबर सायं. ५:३० वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे



मुंबईतील प्रयोग -


सोमवार १३ नोव्हेंबर दु. ४ वा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले
शनिवार १८ नोव्हेंबर दु. ४ वा. यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा
रविवार १९ नोव्हेंबर दु. ४ वा. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली


Comments
Add Comment

दिवाळीच्या आधी परिणितीने दिली गुड न्यूज , परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा झाले आईबाबा...

चड्डा घराण्यात चिमुकल्याचा आगमन झालं आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्डाने दिली गुड न्युज. परिणीती आणि राघव यांनी

माझं कधी काय होईल मला माहित नाही... नाव ठेवणाऱ्यांना स्पष्टच बोलल्या उषा नाडकर्णी

मुंबई : मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्री मधल्या उषा नाडकर्णी बरेचदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात.

अभिनेत्री काजोलचे कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांना दुखावणारे वक्तव्य, उफाळला नवा नाद

मुंबई : सध्या बॉलीवूडच्या अभिनेत्री त्यांच्या कामाच्या वेळेबद्दल काही ना काही वक्तव्य करत आहेत. सर्वात आधी

२०२६ ची होळी सनी देओलसाठी ठरणार का महत्त्वाची ? आगामी चित्रपटाची तारीख जाहीर

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याच्या नवीन चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबत त्याने

भाईजानच्या सुरक्षेत वाढ, शूटींग दरम्यान फोन जवळ ठेवणेही बंधनकारक

मुंबई: सलमान खान नेहमीच त्याला येणाऱ्या धमक्यांमुळे चर्चेत असतो. सलमानला सतत येणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या

'ठरलं तर मग' मालिकेत आजीची भूमिका साकारणार रोहिणी हट्टंगडी

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.