नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयानशी फोनवर चर्चा केली आणि पश्चिम आशियाच्या स्थितीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्धाचे क्षेत्र पश्चिम आशियात येते. गेल्या ७ ऑक्टोबरपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे आणि हजारो लोक मारले गेले आहेत. या दरम्यान, जग भारताकडे आशेने बघत आहे आणि जर कोणी शांतीचे पाऊल उचलेल तर ते पाऊल भारत उचलणार आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या अधिकृत X हँडलवरील एक पोस्टमध्ये सांगितले, पश्चिम आशियामधील स्थितीबाबत माझे बंधू संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासोबत चांगली चर्चा झाली. आम्ही दहशतवाद, बिघडत चाललेली सुरक्षा स्थिती आणि नागरिकांचे जीव यावर चिंता व्यक्त केली. आम्ही सुरक्षा आणि मानवीय स्थितीबाबत लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी सहमत आहोत आणि हे सर्वांच्याच हिताचे आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात जोरदार युद्ध आहे. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. इस्त्रायलने गाझा पट्टीवर जोरदार हल्ले करत गाझापट्टी उद्ध्वस्त केली आहे.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…