Nitesh Rane : बेबी पेंग्विनला लवकरच अटक होणार!

खाजगी विमानाने गाठलं डेहराडून, हीच का ठाकरेंची मराठा आरक्षणाविषयी काळजी?


आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल


मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारवर निशाणा साधणार्‍या उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चांगलीच शाळा घेतली आहे. मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) छत्तीसगड दौर्‍यावर गेले, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. या टीकेचा समाचार घेत नितेश राणे यांनी ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या एक्स (X) तसेच फेसबुक (Facebook) अकाऊंटवरुन नितेश राणे यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.


नितेश राणे यांनी लिहिले आहे की, मला मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे कुटुंब काल दुपारी एक वाजता खासगी विमानातून आणि गेट नंबर आठमधून त्यांचे कामगार आणि आचारी सोबत घेऊन डेहराडूनला रवाना झालं. हीच का ठाकरेंची मराठा आरक्षणाविषयी काळजी? मनोज जरांगे यांचं उपोषण संपेपर्यंत देखील त्यांना थांबता नाही आलं का? मग हे लोक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका कशी करु शकतात? ते तर पक्षाच्या कामाकरता गेले होते, यांच्यासारखे पिकनिक करायला नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली.


बेबी पेंग्विनला लवकरच अटक होणार!


तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. त्याच्या काही दिवस आधीच दिशा सालियन हिनेदेखील आत्महत्या केली होती. त्यानंतर नितेश राणे सातत्याने या दोन्ही आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नाव घेत आहेत. त्यावरही नितेश राणे यांनी या ट्विटमध्ये भाष्य केले आहे. ते म्हणतात, बेबी पेंग्विनला सुशांत सिंह राजपूतबद्दल कोर्टात सुरु होणार्‍या केसमध्ये लवकरच अटक होणार आहे. ही अटक टाळण्यासाठी बेबी पेंग्विन डेहराडूनमधूनच गायब होणार नाही, अशी मी अपेक्षा करतो, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु