Nitesh Rane : बेबी पेंग्विनला लवकरच अटक होणार!

खाजगी विमानाने गाठलं डेहराडून, हीच का ठाकरेंची मराठा आरक्षणाविषयी काळजी?


आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल


मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारवर निशाणा साधणार्‍या उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चांगलीच शाळा घेतली आहे. मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) छत्तीसगड दौर्‍यावर गेले, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. या टीकेचा समाचार घेत नितेश राणे यांनी ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या एक्स (X) तसेच फेसबुक (Facebook) अकाऊंटवरुन नितेश राणे यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.


नितेश राणे यांनी लिहिले आहे की, मला मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे कुटुंब काल दुपारी एक वाजता खासगी विमानातून आणि गेट नंबर आठमधून त्यांचे कामगार आणि आचारी सोबत घेऊन डेहराडूनला रवाना झालं. हीच का ठाकरेंची मराठा आरक्षणाविषयी काळजी? मनोज जरांगे यांचं उपोषण संपेपर्यंत देखील त्यांना थांबता नाही आलं का? मग हे लोक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका कशी करु शकतात? ते तर पक्षाच्या कामाकरता गेले होते, यांच्यासारखे पिकनिक करायला नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली.


बेबी पेंग्विनला लवकरच अटक होणार!


तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. त्याच्या काही दिवस आधीच दिशा सालियन हिनेदेखील आत्महत्या केली होती. त्यानंतर नितेश राणे सातत्याने या दोन्ही आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नाव घेत आहेत. त्यावरही नितेश राणे यांनी या ट्विटमध्ये भाष्य केले आहे. ते म्हणतात, बेबी पेंग्विनला सुशांत सिंह राजपूतबद्दल कोर्टात सुरु होणार्‍या केसमध्ये लवकरच अटक होणार आहे. ही अटक टाळण्यासाठी बेबी पेंग्विन डेहराडूनमधूनच गायब होणार नाही, अशी मी अपेक्षा करतो, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.

Comments
Add Comment

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ; हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती मुंबई :

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात