दिल्लीची हवा तीन वर्षांनंतर सर्वात खराब

प्रदूषण कमी करण्यासाठी अँटी स्मॉग गनमधून पाण्याची फवारणी


नवी दिल्ली : दिल्लीतील हवेची गुणवत्ता सातत्याने घसरत आहे. राजधानीतील हवेची गुणवत्ता तीन वर्षांनंतर ऑक्टोबरमध्ये सर्वात खराब नोंदवली गेली. ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी राजधानीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३२७ वर नोंदवला गेला. जो अजूनही सतत वाढत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२० मध्ये दिल्लीचा सरासरी एक्यूआय २५७ होता. याशिवाय, ऑक्टोबर २०२१ मध्ये एक्यूआय १७३आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये २१० नोंदवले गेले.


दुसरीकडे मुंबईतही परिस्थिती चांगली नाही. येथेही हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत आहे. मुंबई वायू प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत सूचना जारी केली आहे. यामध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम , टाटा पॉवर आणि इतर कंपन्यांना त्यांचे उत्पादन अर्ध्यावर कमी करण्यास सांगितले आहे. शास्त्रज्ञांनी वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते कमी पाऊस हे प्रदूषण वाढण्याचे प्रमुख कारण आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये केवळ एकाच दिवशी ५.४ मिमी पाऊस झाला. तर ऑक्टोबर २०२२2 मध्ये ६ दिवस १२९ मिमी तर ऑक्टोबर २०२१मध्ये ७ दिवस १२३ मिमी पाऊस पडला होता.


दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये जाळणे हे देखील प्रदूषण वाढण्याचे एक प्रमुख कारण मानले जात आहे. हरियाणा आणि पंजाबसह देशाच्या उत्तरेकडील भागात अद्यापही रान जाळण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि आसपासच्या परिसरात हवेत धुके वाढत आहे.

Comments
Add Comment

Gujarat ATS : गुजरात एटीएसकडून जैश-ए-मोहम्मदच्या संशयित मॉड्यूलचा पर्दाफाश , ८ आरोपी अटकेत

अहमदाबाद : गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अनेक राज्यांमध्ये संयुक्त कारवाई करत, बंदी घातलेल्या

Waterfall Trip : धबधब्याखाली भिजायचंय? मग हे 5 वॉटरप्रूफ गॅझेट्स नक्की सोबत ठेवा

वॉटरफॉल ट्रिपची तयारी झाली? धबधब्याखाली (Waterfall) मनसोक्त भिजण्याचा आनंद घ्या, पण तुमचा फोन, गॅझेट्स (Gadgets) आणि

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या

Indian Armed Forces: संरक्षण दलांची युद्धसज्जता वाढवण्यासाठी 52,000 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 03 जुलै 2026 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने