नवी दिल्ली : दिल्लीतील हवेची गुणवत्ता सातत्याने घसरत आहे. राजधानीतील हवेची गुणवत्ता तीन वर्षांनंतर ऑक्टोबरमध्ये सर्वात खराब नोंदवली गेली. ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी राजधानीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३२७ वर नोंदवला गेला. जो अजूनही सतत वाढत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२० मध्ये दिल्लीचा सरासरी एक्यूआय २५७ होता. याशिवाय, ऑक्टोबर २०२१ मध्ये एक्यूआय १७३आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये २१० नोंदवले गेले.
दुसरीकडे मुंबईतही परिस्थिती चांगली नाही. येथेही हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत आहे. मुंबई वायू प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत सूचना जारी केली आहे. यामध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम , टाटा पॉवर आणि इतर कंपन्यांना त्यांचे उत्पादन अर्ध्यावर कमी करण्यास सांगितले आहे. शास्त्रज्ञांनी वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते कमी पाऊस हे प्रदूषण वाढण्याचे प्रमुख कारण आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये केवळ एकाच दिवशी ५.४ मिमी पाऊस झाला. तर ऑक्टोबर २०२२2 मध्ये ६ दिवस १२९ मिमी तर ऑक्टोबर २०२१मध्ये ७ दिवस १२३ मिमी पाऊस पडला होता.
दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये जाळणे हे देखील प्रदूषण वाढण्याचे एक प्रमुख कारण मानले जात आहे. हरियाणा आणि पंजाबसह देशाच्या उत्तरेकडील भागात अद्यापही रान जाळण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि आसपासच्या परिसरात हवेत धुके वाढत आहे.
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…