Categories: देश

दिल्लीची हवा तीन वर्षांनंतर सर्वात खराब

Share

प्रदूषण कमी करण्यासाठी अँटी स्मॉग गनमधून पाण्याची फवारणी

नवी दिल्ली : दिल्लीतील हवेची गुणवत्ता सातत्याने घसरत आहे. राजधानीतील हवेची गुणवत्ता तीन वर्षांनंतर ऑक्टोबरमध्ये सर्वात खराब नोंदवली गेली. ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी राजधानीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३२७ वर नोंदवला गेला. जो अजूनही सतत वाढत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२० मध्ये दिल्लीचा सरासरी एक्यूआय २५७ होता. याशिवाय, ऑक्टोबर २०२१ मध्ये एक्यूआय १७३आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये २१० नोंदवले गेले.

दुसरीकडे मुंबईतही परिस्थिती चांगली नाही. येथेही हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत आहे. मुंबई वायू प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत सूचना जारी केली आहे. यामध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम , टाटा पॉवर आणि इतर कंपन्यांना त्यांचे उत्पादन अर्ध्यावर कमी करण्यास सांगितले आहे. शास्त्रज्ञांनी वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते कमी पाऊस हे प्रदूषण वाढण्याचे प्रमुख कारण आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये केवळ एकाच दिवशी ५.४ मिमी पाऊस झाला. तर ऑक्टोबर २०२२2 मध्ये ६ दिवस १२९ मिमी तर ऑक्टोबर २०२१मध्ये ७ दिवस १२३ मिमी पाऊस पडला होता.

दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये जाळणे हे देखील प्रदूषण वाढण्याचे एक प्रमुख कारण मानले जात आहे. हरियाणा आणि पंजाबसह देशाच्या उत्तरेकडील भागात अद्यापही रान जाळण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि आसपासच्या परिसरात हवेत धुके वाढत आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

9 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

10 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

10 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

11 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

12 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

12 hours ago