Wamanrao Pai : व्यापूनी राहिला अकळ...


  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे.
शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ
बापरखुमादेवीवरू विठ्ठलु सकळ।
अकळ व सकळ या दोन्ही शब्दांचे अर्थ कळले पाहिजेत. आपण म्हणतो ते हे सकळ नव्हे. सकळ म्हणजे कळणारा, कळण्यात येणारा हा त्याचा अर्थ आहे. शून्य म्हणजे आपल्याला जे दिसत नाही ते. आकळता येते त्यापलीकडचे म्हणजे मन, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ते शून्य. स्थावर म्हणजे Material. जंगम म्हणजे living गोष्टी. हलते चालते ते जंगम. “व्यापूनी राहिला अकळ.” सर्व व्यापून राहिला म्हणजे उरला, तो अकळ आहे म्हणजे कळण्यात येणार नाही. “बापरखुमादेवीवरू विठ्ठलु सकळ.”



रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी
देही असोनिया देव,वृथा फिरतो निदैव।
देव असे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी
नाभी मृगाचे कस्तुरी, व्यर्थ हिंडे वनांतरी।
दुधी असता नवनीत, नेणे तयाचे मथित
तुका सांगे मूढजना, देव देही का पाहाना।



इथेसुद्धा एकेक दृष्टांत दिलेले आहेत. पण परफेक्ट कुठलाच नाही. “नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी.” “दुधी असता नवनीत,नेणे तयाचे मथित” हा दृष्टांत जरा जवळ जाणारा आहे. “तुका सांगे मूढजना, देव देही का पहाना.” देवाला पाहण्यासाठी कुठे शोधत जाता? चारधाम. घाम गाळतात, दाम खर्च करतात व शेवटी दमून जातात, आता आपल्या घरी जाऊया. कितीही फिरलात, तरी घरी आल्याशिवाय बरे वाटत नाही. घारापुरीला जा नाही, तर पाणीपुरी खायला जा शेवटी घर ते घर.



सांगायचा मुद्दा परमेश्वराबद्दल कितीही बोलले, तरी ते limited बोलता येते. अकळ व सकळ हे फार महत्त्वाचे आहे. आपल्या ठिकाणी तो सकळ आहे. ईश्वररूपाने आपण त्याचा बोध घेऊ शकतो. किंबहुना होतो निरनिराळ्या प्रकारे. हा बोध कसा घ्यायचा, त्याला पाहायचे कसे? त्याला अनुभवायचे कसे हे सद्गुरू शिकवितात. म्हणून,
सद्गुरूवाचोनी
सापडेना सोय,
धरावे ते पाय आधी आधी।
आपणासारिखे करिती तत्काळ,
नाही काळवेळ तयालागी।
लोह परिसाची न साहे उपमा,
सद्गुरू महिमा अगाध।
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन,
गेले विसरोनी खऱ्या देवा।



सद्गुरूंना शरण जायचे की जायचे नाही, हे तू ठरव. म्हणून ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’

Comments
Add Comment

संचिताचा जीवनावर प्रभाव

आपल्या प्रबोधनाचा विषय म्हणजेच "अंधारातून प्रकाशाकडे" हा पाहताना, आपण इतरही काही महत्त्वाचे विषय समजावून

ईश्वराचे अस्तित्व

मानवजातीच्या इतिहासात “ईश्वर आहे का?” हा प्रश्न केवळ धार्मिक नसून तत्त्वज्ञान, विज्ञान, मानसशास्त्र आणि

विठूची पुरणपोळी भक्तीचा उत्सव

"शिखरशिंगणापुरची आख्यायिका जुनी..." "विठ्ठलाला पुरणपोळी अर्पणाची धुनी..." "वाद नको नियमांचा, भावच खरी

“हरि बोल...!’’

काझीसाब, आज आपला सारा गावच पागल झालाय, असे वाटतेय. प्रत्येकाच्या तोंडून फक्त एकच शब्द येतोय.. “हरि बोल... हरि

संत नामदेव

बाप कवणाचा माय कवणाची बाप कवणाचा माय कवणाची । सोयरी धायरी तेही कवणाची ॥ द्रव्य संपत्ती देखती तंवचि मानिती

मानवी संस्कृती

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आज जगात जे काही चाललेले आहे ते सर्वकाही संस्कारांमुळे चाललेले आहे. अनिष्ट