Maratha Reservation: आंदोलनात आतापर्यंत १६८ लोक अटकेत, १४१ जणांवर गुन्हे दाखल

मुंबई: महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. राज्याच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलने झाले. या दरम्यान, अनेक राजकीय पक्षांना निशाणा बनवण्यात आले. राज्यातील या हिंसक आंदोलनादरम्यान आतापर्यंत १४० हून अधिक केस दाखल करण्यात आले आहेत तर आतापर्यंत १६८ लोकांना अटक झाली आहे. ही माहिती महाराष्ट्राचे डीजीपी रजनीश सेठ यांनी दिली आहे.


डीजीपी रजनीश सेठ म्हणाले, मराठा आरक्षणासाठी विविध ठिकाणी आंदोलने झाले. काही आंदोलने शांततापूर्ण करण्यात आली तर काही ठिकाणी हिंसक वळण मिळाले. अनेक ठिकाणी आंदोलकांनी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले. संभाजीनगर रेंजमध्ये एकूण ४ केस दाखल झाल्या. १०६ लोकांना अटक करण्यात आली. यात बीडमध्ये २० केस आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात १४१ केस दाखल करण्यात आल्या आहेत. एकूण १६८ लोकांना अटक करण्यात आली आहे.



होमगार्डचे ७००० जवान तैनात


डीजीपीने सांगितले की भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ अन्वये ७ लोकांविरुद्ध केस दाखल करण्यात आल्या आहेत. संभाजी नगर ग्रामीण, जालना आणि बीडमध्ये इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे. डीजीपी रजनीश सेठ यांनी सांगितले की एसआरपीएफच्या १७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय बीडमध्ये एक तुकडी आणि ७००० होमगार्ड तैनात करण्यात आले आहे. राज्यात हिंसक आंदोलनादरम्यान १२ कोटींच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले आहे.

कायदे-सुव्यवस्था बिघडणाऱ्यांवर कडक कारवाई - डीजीपी


राज्य पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कायदे-व्यवस्था बिघडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. पोलिसांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. जर कोणीही कायदे-व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून होत असलेल्या हिंसक आंदोलनावरून बुधवारी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली.
Comments
Add Comment

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून