Mukesh Ambani threat mails : मुकेश अंबानींच्या मागे धमकीसत्र सुरुच; मेल करणारा म्हणतो, आता ४०० कोटी द्या...

गोळ्या घालण्याची दिली धमकी


मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. म्हणूनच की काय त्यांना धमकी देणारा पैशांची मागणी दुपटी तिपटीने वाढवतच चालला आहे. चार दिवसांपूर्वी धमकी देणार्‍या व्यक्तीकडूनच मुकेश अंबानींना पुन्हा एकदा धमकीचा ई-मेल (Threat mail) आला आहे. यावेळेस तब्बल ४०० कोटी रुपयांची (400 crores) मागणी करण्यात आली आहे. पैसे दिले नाही तर गोळ्या घालू, असंही या मेलमध्ये म्हटलं आहे.


मुकेश अंबानींना २७ ऑक्टोबरला त्यांच्या ई-मेल अकाऊंटवरुन एका अज्ञात व्यक्तीचा मेल आला होता. या मेलमध्ये त्याने २० कोटी रुपयांची मागणी करत पैसे दिले नाही तर जीवेमारण्याची धमकी दिली होती. शिवाय मारण्यासाठी आमच्याकडे उत्तम नेमबाज आहेत, असंही त्याने म्हटलं होतं. यासंबंधी अंबानींच्या सुरक्षारक्षकांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, तपास सुरु असताना दुसर्‍याच दिवशी पुन्हा एकदा त्याच व्यक्तीकडून धमकीचा मेल आला, ज्यात २०० कोटींची मागणी केली होती. आधीच्या मेलला उत्तर न दिल्याने हा मेल केला असल्याचे त्याने म्हटले होते.


यानंतर पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांनी त्याच व्यक्तीचा धमकीचा मेल आला आहे. पुन्हा एकदा रिप्लाय न दिल्याने हा मेल करण्यात आला आहे. ४०० कोटी रुपये द्या नाहीतर गोळ्या घालू, असं त्या व्यक्तीने म्हटलं आहे. 'तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही आम्ही तुम्हाला मारू शकतो. यावेळी किंमत ४०० कोटी रुपये आहे आणि पोलीस आमचा तपास करुन अटक करू शकत नाहीत', असंही या मेलमध्ये म्हटलं आहे. या धमकीचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी कालपासून अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी (अँटिलियाची) सुरक्षा वाढवली आहे.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन