Mukesh Ambani threat mails : मुकेश अंबानींच्या मागे धमकीसत्र सुरुच; मेल करणारा म्हणतो, आता ४०० कोटी द्या...

गोळ्या घालण्याची दिली धमकी


मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. म्हणूनच की काय त्यांना धमकी देणारा पैशांची मागणी दुपटी तिपटीने वाढवतच चालला आहे. चार दिवसांपूर्वी धमकी देणार्‍या व्यक्तीकडूनच मुकेश अंबानींना पुन्हा एकदा धमकीचा ई-मेल (Threat mail) आला आहे. यावेळेस तब्बल ४०० कोटी रुपयांची (400 crores) मागणी करण्यात आली आहे. पैसे दिले नाही तर गोळ्या घालू, असंही या मेलमध्ये म्हटलं आहे.


मुकेश अंबानींना २७ ऑक्टोबरला त्यांच्या ई-मेल अकाऊंटवरुन एका अज्ञात व्यक्तीचा मेल आला होता. या मेलमध्ये त्याने २० कोटी रुपयांची मागणी करत पैसे दिले नाही तर जीवेमारण्याची धमकी दिली होती. शिवाय मारण्यासाठी आमच्याकडे उत्तम नेमबाज आहेत, असंही त्याने म्हटलं होतं. यासंबंधी अंबानींच्या सुरक्षारक्षकांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, तपास सुरु असताना दुसर्‍याच दिवशी पुन्हा एकदा त्याच व्यक्तीकडून धमकीचा मेल आला, ज्यात २०० कोटींची मागणी केली होती. आधीच्या मेलला उत्तर न दिल्याने हा मेल केला असल्याचे त्याने म्हटले होते.


यानंतर पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांनी त्याच व्यक्तीचा धमकीचा मेल आला आहे. पुन्हा एकदा रिप्लाय न दिल्याने हा मेल करण्यात आला आहे. ४०० कोटी रुपये द्या नाहीतर गोळ्या घालू, असं त्या व्यक्तीने म्हटलं आहे. 'तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही आम्ही तुम्हाला मारू शकतो. यावेळी किंमत ४०० कोटी रुपये आहे आणि पोलीस आमचा तपास करुन अटक करू शकत नाहीत', असंही या मेलमध्ये म्हटलं आहे. या धमकीचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी कालपासून अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी (अँटिलियाची) सुरक्षा वाढवली आहे.

Comments
Add Comment

मी परकी नाही, उत्तर भारतीय मराठीच आहे’; मैथिली ठाकूरची मुंबईत प्रचारात एन्ट्री, मराठी गीताने वेधलं लक्ष

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराला १०० तासांपेक्षा कमी कालावधी

मतदान करा आणि हॉटेलमध्ये जावून कमी पैशात खा - मतदार जानजागृतीसाठी आहार संघटनेचा पुढाकार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये

निवडणुकीच्या कामांसाठी गैरहजर राहणाऱ्यांविरोधात सोमवारपासून पोलिस कारवाई

तब्बल ६,८७१ कर्मचारी,अधिकाऱ्यांना नोटीस सोमवारपासून साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या घरी पोलिसांचे समन्स मुंबई

दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दूरवस्था

सत्ता काळात दुर्लक्ष, निवडणूक जवळ येताच उबाठाला झाली आठवण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

दहिसर ते भाईंदर टप्प्यातील सुरक्षा तपासणीला सुरुवात मुंबई : दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक

उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी