दिल्ली दारू घोटाळा, ईडीकडून केजरीवाल यांना नोटीस

  76

नवी दिल्ली: दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणात(liquor scam) आता अंमलबजावणी संचलनालयाकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ईडीने मुख्यमंत्री केजरीवालांना २ नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. याआधी मुख्यमंत्र्यांना सीबीआयने एप्रिल महिन्यात चौकशीसाठी बोलावले होते.


हे समन्स त्याच वेळेला आलेत जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मनीष सिसोदिया यांची जामीन याचिका फेटाळून लावली. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना मोठा झटका देताना तपास विभागाने ३३८ कोटी रूपयांचा व्यवहार अस्थायीपणाने केल्याचे म्हटले आहे.



खोटी केस बनवत आहे केंद्र सरकार - आप


आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करण्यात आले की आम आदमी पक्ष संपुष्टात आणणे हा केंद्र सरकारचा हेतू आहे. केंद्र सरकारला खोटी केस बनवून केजरीवाला तुरूंगात टाकायचे आहे.



त्यांना केजरीवालांना अटक करायची आहे - सौरभ भारद्वाज


सीएम केजरीवाल यांना मिळालेल्या समन्सवर दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की केंद्र सरकारच्या ईडीने अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजपला आम आदमी पक्ष संपवायचा आहे.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके