Manoj Jarange Patil : उठताना जरांगे कोसळले; प्रकृती ढासळली!

जरांगेंनी पाणी प्यावं म्हणून ग्रामस्थ आक्रमक


जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आज उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळली आहे. यावेळेस पाण्याचाही त्यांनी त्याग केला आहे. दोन वेळा विशेष विनंतीवरुन त्यांनी पाण्याचा फक्त घोट घेतला आहे. शिवाय ते डॉक्टरांना उपचारही करु देत नाही आहेत, त्यामुळे जरांगेंना बोलण्यातही अडचणी येत आहेत. आज माध्यमांशी संवाद साधण्यासाठी उठत असताना ते जागेवर कोसळले. आधार देऊन त्यांना बसवण्यात आलं. यामुळे त्यांनी पाणी प्यायलंच पाहिजे यासाठी तेथे उपस्थित असलेले मराठा बांधव आक्रमक झाले होते.


उपोषणस्थळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सातत्याने त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे यांना उपचारांची खूपच गरज आहे. पाच ते सहा दिवस झाले त्यांच्या पोटात पाणीदेखील नाही. त्यामुळे डिहायड्रेशन खूप झालं आहे. त्यांना खूपच वीकनेस आला आहे. बीपी आणि शुगरही कमी झाले असल्याची शक्यता आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर त्यांच्या लिव्हरवर आणि किडनीवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो, असं डॉक्टर म्हणाले.



डॉक्टर्स जरांगेंना तासातासाला पाणी पिण्याची विनंती करत आहेत, मात्र आरक्षण हाच माझ्यावरचा एकमेव उपचार आहे, असं जरांगे म्हणाले. जरांगे यांची प्रकृती ढासळत चालल्याने अनेक जिल्ह्यांमधून मराठा आंदोलनाचे समर्थक आंतरवालीत दाखल होत आहेत. अनेक आंदोलक आक्रोशही करत आहेत. पण जोपर्यंत माझ्या तोंडून शब्द निघत आहेत तोपर्यंत चर्चेसाठी या, असं आवाहनही जरांगे यांनी सरकारला केलं आहे.


दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर जरांगेंना उठणं शक्य न झाल्याने त्यांनी पाणी प्यावं यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. जरांगेंनी पाणी प्यायलंच पाहिजे, अशा हट्टाला ते पेटले होते. त्यांच्या विनंतीचा मान राखून जरांगे तीन ते चार घोट पाणी पिण्यासाठी तयार झाले आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन