Manoj Jarange Patil : उठताना जरांगे कोसळले; प्रकृती ढासळली!

जरांगेंनी पाणी प्यावं म्हणून ग्रामस्थ आक्रमक


जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आज उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळली आहे. यावेळेस पाण्याचाही त्यांनी त्याग केला आहे. दोन वेळा विशेष विनंतीवरुन त्यांनी पाण्याचा फक्त घोट घेतला आहे. शिवाय ते डॉक्टरांना उपचारही करु देत नाही आहेत, त्यामुळे जरांगेंना बोलण्यातही अडचणी येत आहेत. आज माध्यमांशी संवाद साधण्यासाठी उठत असताना ते जागेवर कोसळले. आधार देऊन त्यांना बसवण्यात आलं. यामुळे त्यांनी पाणी प्यायलंच पाहिजे यासाठी तेथे उपस्थित असलेले मराठा बांधव आक्रमक झाले होते.


उपोषणस्थळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सातत्याने त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे यांना उपचारांची खूपच गरज आहे. पाच ते सहा दिवस झाले त्यांच्या पोटात पाणीदेखील नाही. त्यामुळे डिहायड्रेशन खूप झालं आहे. त्यांना खूपच वीकनेस आला आहे. बीपी आणि शुगरही कमी झाले असल्याची शक्यता आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर त्यांच्या लिव्हरवर आणि किडनीवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो, असं डॉक्टर म्हणाले.



डॉक्टर्स जरांगेंना तासातासाला पाणी पिण्याची विनंती करत आहेत, मात्र आरक्षण हाच माझ्यावरचा एकमेव उपचार आहे, असं जरांगे म्हणाले. जरांगे यांची प्रकृती ढासळत चालल्याने अनेक जिल्ह्यांमधून मराठा आंदोलनाचे समर्थक आंतरवालीत दाखल होत आहेत. अनेक आंदोलक आक्रोशही करत आहेत. पण जोपर्यंत माझ्या तोंडून शब्द निघत आहेत तोपर्यंत चर्चेसाठी या, असं आवाहनही जरांगे यांनी सरकारला केलं आहे.


दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर जरांगेंना उठणं शक्य न झाल्याने त्यांनी पाणी प्यावं यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. जरांगेंनी पाणी प्यायलंच पाहिजे, अशा हट्टाला ते पेटले होते. त्यांच्या विनंतीचा मान राखून जरांगे तीन ते चार घोट पाणी पिण्यासाठी तयार झाले आहेत.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा