Train Derail: आंध्र प्रदेशमध्ये दोन रेल्वेंची टक्कर, रुळावरून घसरले पॅसेंजर रेल्वेचे ३ डबे

विजयनगरम: आंध्र प्रदेशच्या(andhra pradesh) विजयनगरमजवळ एका पॅसेंजर रेल्वे रूळावरून घसरली. न्यूज एजन्सी एएनआयच्या माहितीनुसार विजयनगरम जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेची धडक दुसऱ्या रेल्वेला बसली. या अपघातात रेल्वेचे ३ डबे रूळावरून घसरले.


मिळालेल्या माहितीनुसार, कोथावलासा अलमांदा-कंटाकापल्लीमध्ये विशाखा येथून रायगढा येथे जाणारी रेल्वे रूळावरून घसरली. या अपघातात १० प्रवासी जखमी झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले आहे.


 


मुख्यमंत्र्यांनी दिले अॅम्ब्युलन्स पाठवण्याचे आदेश


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सीएम वायएस जगनमोहन रेड्डी यांनी तात्काळ उपाययोजनेसाठी आणि विजयनगरम जिल्ह्याच्या जवळील जिल्हा विशाखापट्टणम आणि अनाकापल्ली येथून अधिकाधिका अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच चांगल्या उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.


रेल्वे प्रबंधक मंडळाने सांगितले, मदत आणि अॅम्ब्युलन्ससाठी स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफला सूचना देण्यात आल्या आहेत. या रेल्वे अपघाताबाबत ईस्ट कोस्ट रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.
भुवनेश्वर - 0674-2301625, 2301525, 2303069, वाल्टेयर- 0891- 2885914.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला