PM Mann Ki Baat: पंतप्रधान मोदी आज करणार मन की बात, या गोष्टींवर होणार चर्चा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओ कार्यक्रम मन की बात(mann ki baat) च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतात. आज २७ ऑक्टोबरच्या कार्यक्रमात १०६वा एपिसोड प्रसारित केला जाईल. या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन आणि दिवाळीच्या सणाबाबत खास चर्चा करू शकतात. गेल्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी चांद्रयान ३ पासून ते जी-२०च्या यशापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर आपले विचार मांडतील. हा मासिक रेडिओ कार्यक्रम आकाशवाणी, दूरदर्शन, AIR अॅपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय पंतप्रधान कार्यालय, सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेल्सवरही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईआल.



गेल्या एपिसोडमध्ये काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी


गेल्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी चांद्रयान ३चे लँडिंग पासून ते जी़-२०च्या यशस्वी आयोजनावर चर्चा केली होती. पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले होते की मला पुन्हा एकदा भारत देश आणि देशातील नागरिकांचे यश साजरे करण्याची संधी मिळत आहे. सगळ्यात जास्त अभिनंदाचे मेसेज मला चांद्रयान ३ चे लँडिंग आणि दिल्लीतील जी-२०च्या यशस्वी आयोजनाबद्दल मिळाले.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने