Kerala Blast: केरळमधील स्फोटानंतर देशातील अनेक शहरांमध्ये अलर्ट

कोची: केरळच्या कोचीमध्ये(kochi) एका कन्वेशन सेंटरमध्ये प्रार्थना सभा सुरू असताना जोरदार बॉम्बहल्ला झाला. स बॉम्बस्फोट झाला तेव्हा प्रार्थनेसाठी २०००हून अधिक लोक एकत्र जमले होते. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. प्रार्थना सभेचे आयोजन शहरातील कन्वेशन सेंटरमध्ये करण्यात आले होते. आतापर्यंत या स्फोटाचे कारण समजलेले नाही.


ख्रिश्चन धर्माचा एक समूह कन्वेशन सेंटरमध्ये प्रार्थना करत होता. तेव्हा जोरदार बॉम्बस्फोट झाला. या स्फोटानंतर अनेक ठिकाणी जोरदार किंकाळ्यांचे आवाज येत होते. स्फोटानंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये तुटलेल्या काचा आणि फर्निचर दिसत आहे. हा स्फोट यहोवाच्या साक्षियांच्या प्रार्थनेदरम्यान झाला.



केरळ स्फोटानंतर दिल्ली पोलीस अलर्ट


दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या कलामासेरी स्थित कन्वेशन सेंटरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दिल्ली पोलीसही हाय अलर्ट मोडवर आहे. गर्दी असलेल्या ठिकाणांवर नजर ठेवली जात आहे. स्पेशल सेल सातत्याने गुप्तहेर एजन्सीच्या संपर्कात आहे. कोणतेही मिळालेले इनपट हलक्यात घेतले जाणार नाही. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.



घटनेच्या मागील सूत्रधारांचा तपास सुर - परराष्ट्र राज्य मंत्री


परराष्ट्र राज्य मंत्री व्ही मुरलीधरन म्हणाले या घटनेबाबत केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत. मला विश्वास आहे की ते या घटनेच्या मुळापर्यंत जातील आणि या स्फोटामागचे कारण आणि सूत्रधाराचा तपास घेतील.

Comments
Add Comment

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने

Rain Alert: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस आणि गारपिटीची शक्यता

नवी दिल्ली: दिल्ली एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांमुळे हवामान बदलले. हवामान विभागाने संपूर्ण उत्तर