Kerala Blast: केरळमधील स्फोटानंतर देशातील अनेक शहरांमध्ये अलर्ट

कोची: केरळच्या कोचीमध्ये(kochi) एका कन्वेशन सेंटरमध्ये प्रार्थना सभा सुरू असताना जोरदार बॉम्बहल्ला झाला. स बॉम्बस्फोट झाला तेव्हा प्रार्थनेसाठी २०००हून अधिक लोक एकत्र जमले होते. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. प्रार्थना सभेचे आयोजन शहरातील कन्वेशन सेंटरमध्ये करण्यात आले होते. आतापर्यंत या स्फोटाचे कारण समजलेले नाही.


ख्रिश्चन धर्माचा एक समूह कन्वेशन सेंटरमध्ये प्रार्थना करत होता. तेव्हा जोरदार बॉम्बस्फोट झाला. या स्फोटानंतर अनेक ठिकाणी जोरदार किंकाळ्यांचे आवाज येत होते. स्फोटानंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये तुटलेल्या काचा आणि फर्निचर दिसत आहे. हा स्फोट यहोवाच्या साक्षियांच्या प्रार्थनेदरम्यान झाला.



केरळ स्फोटानंतर दिल्ली पोलीस अलर्ट


दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या कलामासेरी स्थित कन्वेशन सेंटरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दिल्ली पोलीसही हाय अलर्ट मोडवर आहे. गर्दी असलेल्या ठिकाणांवर नजर ठेवली जात आहे. स्पेशल सेल सातत्याने गुप्तहेर एजन्सीच्या संपर्कात आहे. कोणतेही मिळालेले इनपट हलक्यात घेतले जाणार नाही. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.



घटनेच्या मागील सूत्रधारांचा तपास सुर - परराष्ट्र राज्य मंत्री


परराष्ट्र राज्य मंत्री व्ही मुरलीधरन म्हणाले या घटनेबाबत केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत. मला विश्वास आहे की ते या घटनेच्या मुळापर्यंत जातील आणि या स्फोटामागचे कारण आणि सूत्रधाराचा तपास घेतील.

Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था