India Vs England World cup 2023 : विश्वचषकात पहिल्यांदाच विराट कोहली ९ चेंडूंमध्ये भोपळा घेऊन परतला!

श्रेयस अय्यर, शुभमन गिलही मैदानाबाहेर... इंग्लंडची दमदार खेळी


लखनऊ : आपल्या दमदार खेळीने जगभरात चाहते निर्माण केलेला भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीयांना प्रचंड निराश केले आहे. विश्वचषकातील (World cup 2023) आज भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) सामना लखनऊमध्ये सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या निर्णयावर खूश झाला. भारतालाही प्रथम फलंदाजीच करायची होती, असं त्याने म्हटलं. मात्र, इंग्लंडचा निर्णय त्यांना फायदेशीरच ठरल्याचे सध्याचे चित्र आहे. दमदार खेळी करत त्यांनी भारताच्या तीन अव्वल फलंदाजांना मैदानाबाहेर पाठवले आहे.


भारतीय फलंदाज मैदानावर उतरले आणि इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने चौथ्या षटकात अप्रतिम चेंडूवर शुभमन गिलचा (Shubhman Gill) त्रिफळा उडवला. गिलला ९ धावांवर तंबूत पाठवण्यात आले. विराट कोहली मैदानावर येताच एकच जल्लोष झाला, परंतु त्याला ८ चेंडूंत एकही धाव इंग्लंडच्या गोलंदाजांनी करू दिली नाही. इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी अप्रतिम कामगिरी करून विराटवरील दडपण वाढवले. त्यामुळे विराटकडून चुकीचा फटका खेळला गेला आणि डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर मिड ऑफला बेन स्टोक्सने सहज झेल घेतला. विराट भोपळ्यावर माघारी परतला.


विराट कोहली आणि शुभमन गिल बाद झाल्यामुळे श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खांद्यावर मोठी जबाबदारी होती. मात्र, श्रेयस अय्यर एका शॉर्ट बॉलवर ४ धावांवर बाद झाला. त्यामुळे १९ षटकांतच भारताच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवण्यात इंग्लंडला यश आले आहे.


इंग्लंडने या स्पर्धेतील शेवटच्या पाच सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला आहे. बांगलादेशचा १३७ धावांनी पराभव करत एकदाच इंग्लंडला यश आले. मात्र, इंग्लंडचा संघ न्यूझीलंडकडून ९ विकेट्सने, अफगाणिस्तानकडून ६९ धावांनी, दक्षिण आफ्रिकेकडून २२९ धावांनी आणि श्रीलंकेकडून ८ विकेट्सने पराभूत झाला. याउलट भारत हा आतापर्यंत झालेल्या सामन्यांतील अपराजित संघ आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण आपली जादू दाखवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या

Historical discovery in Denmark : वायकिंग काळातील भव्य वस्त्र उत्पादन केंद्र; हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासावर नवा प्रकाश

Aarhus, Denmark : पुरातत्वशास्त्रज्ञांना डेन्मार्कमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक शोध लागला आहे. जटलँड

Kailash Mansarovar Yatra 2026 : 'कैलास मानसरोवर यात्रेत व्हिसाशिवाय प्रवास टाळा'; परराष्ट्र मंत्रालयकडून भाविकांसाठी अॅडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत (Kailash Mansarovar Yatra 2026)

UPSC Recruitment 2026 : केंद्र सरकारमध्ये १०५ पदांसाठी थेट भरती; कधी पर्यंत कराल अर्ज?

नवी दिल्ली : केंद्र सरकारमध्ये (Central Government) नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. युनियन पब्लिक

TET Paper Leak : ऐनवेळी टीईटीची परीक्षा रद्द! 'नीट' पाठोपाठ आता 'टीईटी' परीक्षेलाही पेपरफुटीचे ग्रहण! जाणून घ्या...

पुणे : राज्यातील लाखो डी.टी.एड (D.T.Ed) आणि बी.एड (B.Ed) धारक तरुण-तरुणींना मोठा धक्का बसला आहे. उद्या, म्हणजेच २८ जून २०२६