Maratha Andolan : सदावर्तेंनंतर मराठा आंदोलकांकडून ठाकरे गटाच्या माजी आमदाराच्या गाडीची तोडफोड

सर्वपक्षीय नेत्यांवर मराठा समाजाचा रोष


बीड : मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळावे म्हणून सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावे अन्यथा गावागावात उपोषण करण्यात येईल, असा इशाराही मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. मराठा समाज पेटून उठला असून गावागावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या संतापातून आंदोलक कधी आत्महत्या तर कधी तोडफोड अशी बेकायदेशीर पावले उचलत आहेत.


दोनच दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची त्यांच्या राहत्या घरासमोर तोडफोड करण्यात आली. यानंतर आता ठाकरे गटाचे (Thackeray Group) माजी आमदार बदामराव पंडित (Badamrao Pandit) यांच्यादेखील गाडीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे मराठ्यांनी केवळ सत्ताधारीच नव्हे तर मागील काळात आरक्षण न देऊ शकलेल्या विरोधकांनाही टार्गेट केले आहे.


बीड जिल्ह्यात असताना हा गाडी फोडण्याचा प्रकार घडला. ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित हे मोही माता यात्रेसाठी गेले होते. दरम्यान, मादळमोही येथे संतप्त मराठा तरुणांनी त्यांची गाडी फोडली. गाडी फोडल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. या घटनेमुळे मराठा समाज आणखी काय काय पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन