Rohit pawar: रोहित पवारांच्या 'युवा संघर्ष यात्रे'ला स्थगिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेबद्दल महत्त्वाचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. त्यांनी पत्रकार परिषद घेत युवा संघर्ष यात्रा स्थगितीची घोषणा केली. राज्यात तरुणांच्या आत्महत्या होत आहे. यामुळे महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच युवा संघर्ष यात्रा थांबवत असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रवदी काँग्रेसकडून राज्यातील तरूण तसेच नागरिकांच्या हितासाठी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या यात्रेचा आजचा चौथा दिवस होता. मात्र चार दिवसानंतर ही यात्रा स्थगित करण्याचा निर्णय रोहित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केला.


ज्या कारणासाठी युवा संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली होती त्या कारणांवर सरकार काहीतरी मार्ग शोधून काढेल अशी अपेक्षा होती. मात्र सध्या राज्यात तरूणांच्या आत्महत्या होत आहे. त्यामुळे राज्यातील हे वातावरण अस्वस्थ करणारे आहेत. ज्यांच्यासाठी आम्ही लढतोय ते आत्महत्या करत आहेत. त्यासाठी सरकारही पावले उचलताना दिसत नाही आहेत.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे