Hasan Mushrif : एका घटनेमुळे शपथ घेतली नाही, नाहीतर जयंत पाटीलदेखील आमच्याबरोबर आले असते…

Share

हसन मुश्रीफ यांचा मोठा गौप्यस्फोट

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) जून महिन्यात फूट पडली आणि अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट निर्माण झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी आमचीच असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे. सरकारची बाजू पटली म्हणून आम्ही सरकारला साथ देत आहोत असे अजितदादांच्या गटाकडून सांगण्यात येते तर शरद पवार गटाने मात्र विरोधी भूमिकेतच राहणे पसंत केले आहे.

राष्ट्रवादीच्या या संघर्षामुळे राज्याच्या राजकारणात (Maharashtra politics) अनेक उलथापालथी झाल्या. दोन्ही गटांतील नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही सुरुच असतात. गेल्या काही दिवसांपासून तर शरद पवारांसोबत राहणे पसंत केलेले जयंत पाटील (Jayant Patil) लवकरच अजितदादांची साथ देणार अशा चर्चा सुरु आहेत. जयंत पाटलांनी हे नाकारुनही या चर्चा थांबत नाहीत. त्यातच आता अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले, “जयंत पाटील यांनीही आमच्याबरोबर शपथ घेतली असती. आता मी इतिहास सांगत बसत नाही. ते गोपनीय आहे. मात्र, आज आम्ही ज्या पक्षाबरोबर गेलो आहे त्यांच्याशी इमान ठेवणं आणि त्यांच्यासाठी जीवाचं रान करणं हा माझा स्वभाव आहे. आता आम्ही भूमिका बदलली आहे. त्या भूमिकेशी प्रामाणिक राहणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे. जयंत पाटील एका घटनेमुळे तिकडे थांबले. ती घटना मी माध्यमांना सांगणार नाही. ती घटना मी नंतर कधीतरी सांगेन. कारण मी नीतिमूल्ये पाळणारा माणूस आहे,” असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी सूचक विधान केलं.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

2 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

3 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

3 hours ago