Hasan Mushrif : एका घटनेमुळे शपथ घेतली नाही, नाहीतर जयंत पाटीलदेखील आमच्याबरोबर आले असते...

हसन मुश्रीफ यांचा मोठा गौप्यस्फोट


कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) जून महिन्यात फूट पडली आणि अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट निर्माण झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी आमचीच असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे. सरकारची बाजू पटली म्हणून आम्ही सरकारला साथ देत आहोत असे अजितदादांच्या गटाकडून सांगण्यात येते तर शरद पवार गटाने मात्र विरोधी भूमिकेतच राहणे पसंत केले आहे.


राष्ट्रवादीच्या या संघर्षामुळे राज्याच्या राजकारणात (Maharashtra politics) अनेक उलथापालथी झाल्या. दोन्ही गटांतील नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही सुरुच असतात. गेल्या काही दिवसांपासून तर शरद पवारांसोबत राहणे पसंत केलेले जयंत पाटील (Jayant Patil) लवकरच अजितदादांची साथ देणार अशा चर्चा सुरु आहेत. जयंत पाटलांनी हे नाकारुनही या चर्चा थांबत नाहीत. त्यातच आता अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.


हसन मुश्रीफ म्हणाले, “जयंत पाटील यांनीही आमच्याबरोबर शपथ घेतली असती. आता मी इतिहास सांगत बसत नाही. ते गोपनीय आहे. मात्र, आज आम्ही ज्या पक्षाबरोबर गेलो आहे त्यांच्याशी इमान ठेवणं आणि त्यांच्यासाठी जीवाचं रान करणं हा माझा स्वभाव आहे. आता आम्ही भूमिका बदलली आहे. त्या भूमिकेशी प्रामाणिक राहणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे. जयंत पाटील एका घटनेमुळे तिकडे थांबले. ती घटना मी माध्यमांना सांगणार नाही. ती घटना मी नंतर कधीतरी सांगेन. कारण मी नीतिमूल्ये पाळणारा माणूस आहे,” असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी सूचक विधान केलं.


Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद