Dhule Leopard news : धुळ्यातील मोघण शिरुड गावात बिबट्याचा उच्छाद

पाच दिवसांत दोन चिमुकल्यांसह तीन जणांचा बळी


धुळे : माणसांनी जंगलावर अतिक्रमण केल्याने प्राण्यांचे मानवी वस्तीत येणे ही आता नवी बाब नाही. त्यांचं घर हिरावल्याने आपणच या गोष्टीला जबाबदार आहोत. मात्र, अशाच एक घटनेमुळे धुळ्यातील (Dhule news) मोघण शिरुड गावातील चिमुकल्यांचे नाहक बळी गेले आहेत. या गावात बिबट्याने (Leopard) शिरकाव करुन उच्छाद मांडला आहे. गेल्या पाच दिवसांत तीन जणांचा बळी गेला असून त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. शिवाय आणखी एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.


शिरुर गावच्या परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत माजवली आहे. त्यामुळे त्याला जेरबंद करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक महिद गुप्ता यांच्याशी या घटनेसंदर्भात आज चर्चा केली. यावेळी त्यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्याचा आणि ते शक्य झालं नाही तर ठार मारण्याचे आदेश दिले आहेत.


शिरुर गावात बिबट्याने घातलेल्या धुमाकुळामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन जणांचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जीव गेल्याने नागरिक घाबरुन वावरत आहेत. काल सकाळी एका लहान बालकाचा देखील बिबट्याने चावा घेतला. त्या बालकावर सध्या हिरे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


एकीकडे बिबट्याने उच्छाद मांडलेला असताना दुसरीकडे गावात कापूस वेचणीच्या कामाला वेग आला आहे. हे दिवस कापूस वेचणीचे असल्याने या वेळेतच गावात बिबट्या शिरल्याने ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे आणि त्या पद्धतीची दवंडी गावात पिटवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये