Dhule Leopard news : धुळ्यातील मोघण शिरुड गावात बिबट्याचा उच्छाद

  119

पाच दिवसांत दोन चिमुकल्यांसह तीन जणांचा बळी


धुळे : माणसांनी जंगलावर अतिक्रमण केल्याने प्राण्यांचे मानवी वस्तीत येणे ही आता नवी बाब नाही. त्यांचं घर हिरावल्याने आपणच या गोष्टीला जबाबदार आहोत. मात्र, अशाच एक घटनेमुळे धुळ्यातील (Dhule news) मोघण शिरुड गावातील चिमुकल्यांचे नाहक बळी गेले आहेत. या गावात बिबट्याने (Leopard) शिरकाव करुन उच्छाद मांडला आहे. गेल्या पाच दिवसांत तीन जणांचा बळी गेला असून त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. शिवाय आणखी एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.


शिरुर गावच्या परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत माजवली आहे. त्यामुळे त्याला जेरबंद करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक महिद गुप्ता यांच्याशी या घटनेसंदर्भात आज चर्चा केली. यावेळी त्यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्याचा आणि ते शक्य झालं नाही तर ठार मारण्याचे आदेश दिले आहेत.


शिरुर गावात बिबट्याने घातलेल्या धुमाकुळामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन जणांचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जीव गेल्याने नागरिक घाबरुन वावरत आहेत. काल सकाळी एका लहान बालकाचा देखील बिबट्याने चावा घेतला. त्या बालकावर सध्या हिरे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


एकीकडे बिबट्याने उच्छाद मांडलेला असताना दुसरीकडे गावात कापूस वेचणीच्या कामाला वेग आला आहे. हे दिवस कापूस वेचणीचे असल्याने या वेळेतच गावात बिबट्या शिरल्याने ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे आणि त्या पद्धतीची दवंडी गावात पिटवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून