Dhule Leopard news : धुळ्यातील मोघण शिरुड गावात बिबट्याचा उच्छाद

  133

पाच दिवसांत दोन चिमुकल्यांसह तीन जणांचा बळी


धुळे : माणसांनी जंगलावर अतिक्रमण केल्याने प्राण्यांचे मानवी वस्तीत येणे ही आता नवी बाब नाही. त्यांचं घर हिरावल्याने आपणच या गोष्टीला जबाबदार आहोत. मात्र, अशाच एक घटनेमुळे धुळ्यातील (Dhule news) मोघण शिरुड गावातील चिमुकल्यांचे नाहक बळी गेले आहेत. या गावात बिबट्याने (Leopard) शिरकाव करुन उच्छाद मांडला आहे. गेल्या पाच दिवसांत तीन जणांचा बळी गेला असून त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. शिवाय आणखी एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.


शिरुर गावच्या परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत माजवली आहे. त्यामुळे त्याला जेरबंद करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक महिद गुप्ता यांच्याशी या घटनेसंदर्भात आज चर्चा केली. यावेळी त्यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्याचा आणि ते शक्य झालं नाही तर ठार मारण्याचे आदेश दिले आहेत.


शिरुर गावात बिबट्याने घातलेल्या धुमाकुळामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन जणांचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जीव गेल्याने नागरिक घाबरुन वावरत आहेत. काल सकाळी एका लहान बालकाचा देखील बिबट्याने चावा घेतला. त्या बालकावर सध्या हिरे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


एकीकडे बिबट्याने उच्छाद मांडलेला असताना दुसरीकडे गावात कापूस वेचणीच्या कामाला वेग आला आहे. हे दिवस कापूस वेचणीचे असल्याने या वेळेतच गावात बिबट्या शिरल्याने ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे आणि त्या पद्धतीची दवंडी गावात पिटवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Nanded Vande Bharat : मुंबई-जालना वंदे भारत आता नांदेडपर्यंत धावणार, जाणून घ्या वेळापत्रक, थांबे अन् तिकीटदर

मुंबई : मुंबई आणि मराठवाड्यातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

सिंहगडावरुन बेपत्ता झालेला गौतम चार दिवसांनी दरीत जिवंत आढळला

पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा येथून बेपत्ता झालेला २४ वर्षांचा गौतम गायकवाड जिवंत आहे. गौतम

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, पुण्यात 27 ते 6 तारखेपर्यंत दारू बंदी

पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात २७ ते ६

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात