iphone: आता टाटा ग्रुप भारतात बनवणार iPhone

नवी दिल्ली: भारतात अॅपलचे आयफोन बनवण्याचे काम लवकरच टाट ग्रुपच्या हातात येणार आहे. भारतात आयफोन बनवणारी कंपनी विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग इंडियाचे अधिग्रहण टाटा ग्रुप करत आहे. या अधिग्रहणाला विस्ट्रॉन इन्फोकॉमची पॅरेंट कंपनी विस्ट्रॉन कॉर्पच्या प्रमुख मंडळाने मंजुरी दिली आहे.


इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्नॉलॉजी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर याची माहिती दिली. टाटा ग्रुप अडीच वर्षांच्या आत डोमेस्टिक आणि जागतिक स्तरावरील मार्केसाठी भारतात iPhones बनवण्यास सुरूवात करेल.


सध्या विस्ट्रॉनचे भारतातील प्लाँट आपल्या ८ प्रॉडक्शन लाईनमध्ये आयफोन १२ आणि आयफोन १४चे मॅन्युफॅक्चरिंग करत आहे. टाटाने अधिग्रहण केल्यानंतर विस्ट्रॉन पूर्णपणे भारतीय बाजारातून बाहेर होईल. कारण हे भारतात अॅपल उत्पादनांचे प्रॉडक्शन कऱणारी कंपनीचा एकमेव प्लांट आहे.



आयटी मंत्र्यांनी टाटांचे केले अभिनंदन


केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले. नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी पीएलआय योजनेने आधीच भारताला स्मार्टफोन विनिर्माण आणि निर्यातीसाठी एक विश्वसनीय आणि प्रमुख केंद्र बनवण्यासाठी प्रेरित केले आहे. आता अडीच वर्षाच्या आत भारतात आयफोन बनण्यास सुरूवात होईल.

Comments
Add Comment

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून