Jammu Kashmir: अर्नियामध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, रात्रभर सुरू होता गोळीबार

श्रीनगर: पाकिस्तानने(pakistan) जम्मू-काश्मीरच्या जवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा एकदा नापाक कारवाई केली. गुरवारी संध्याकाळी उशिरा पाकिस्तानी सैन्याकडून बीएसएफवर निशाणा साधताना जोरदार गोळीबार केला. भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारामुळे सीमेजवळील गावात राहणाऱ्या लोकांना बंकरमध्ये रहावे लागले.


हा गोळीबार गुरूवारी रात्रीपासून सुरू आहे आणि सीमेवर गोळीबाराचा आवाज सरु होता. अर्णिया सेक्टरमधील गावातील नागरिकांनी सांगितले की, गोळीबार रात्रभर सुरू आहे. आमच्या गावापासून बॉर्डर दीड किमी अंतरावर आहे. असे २-३ वर्षानंतर होत आहे. संपूर्ण गावातील नागरिक बंकरमध्ये आहेत. कोणालाच माहीत नाही अखेर काय होणार आहे.


अर्णिया सेक्टरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने सांगितले, गोळीबार काल रात्री ८ वाजल्यापासून सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी जोरदार गोळीबार केला जात आहे. असे साधारण ४-५ वर्षांनी झाले. प्रत्येकजण आपल्या घरात आहेत. आमच्या गावात लग्न सुर होते. तेव्हा सर्व लोक तेथे आले होते. जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा आम्ही लोकांना सांगितले की ते जिथे आहेत तिथेच थांबावे. सगळेजण आपल्या घरात लपले आहेत.



गोळीबाराला लष्कराकडून चोख प्रत्युत्तर


पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानकडून अचानक गोळीबार का केला जात आहे याची माहिती मिळालेली नाही. या गोळीबारात जिवितहानी झाली की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन