India Pakistan Border : पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवणार... सीमेवर उभारणार शिवरायांचा अश्वारुढ पुतळा!

  138

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची वाघनखं (Wagh Nakh) महाराष्ट्रात आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) गेले अनेक दिवस प्रयत्न करत आहेत. मात्र, विरोधकांचे या गोष्टीवरुनही राजकारण करणे चालूच आहे. अनेकांनी वाघनखांवर प्रश्नदेखील उपस्थित केले. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वाघनखांबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठी घोषणा देखील केली.


मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं महाराष्ट्रात, मायदेशी आणली जाणार आहेत, हे देशासाठी अभिमानास्पद असून काहीजण मात्र त्याबाबत शंका उपस्थित करत आहेत. वाघनखांबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून, अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतो आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.


पुढे ते म्हणाले, आमचे मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला स्वतः गेले. एक इतिहास असलेली वाघनखं आपल्या देशात, आपल्या राज्यात आणणं हे प्रत्येक देशवासीयासाठी गौरवास्पद, अभिमानास्पद आणि प्रत्येकाला हेवा वाटावा असं आहे. पण दुसरीकडे काही लोक सरकारच्या प्रत्येक कामावर विरोध, द्वेष, मत्सर व्यक्त करतात. परंतु सांस्कृतिक कार्य विभाग आपलं काम करेल, वाघनखं येतील आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वस्तू आणण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.



सीमेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे. भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भीती वाटेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. याआधीही सीमेवर पुतळा उभारण्यासाठी प्रस्ताव देण्यात आले होते मात्र आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यामुळे हा पुतळा लवकरच उभारला जाणार आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे