India Pakistan Border : पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवणार... सीमेवर उभारणार शिवरायांचा अश्वारुढ पुतळा!

  129

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची वाघनखं (Wagh Nakh) महाराष्ट्रात आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) गेले अनेक दिवस प्रयत्न करत आहेत. मात्र, विरोधकांचे या गोष्टीवरुनही राजकारण करणे चालूच आहे. अनेकांनी वाघनखांवर प्रश्नदेखील उपस्थित केले. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वाघनखांबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठी घोषणा देखील केली.


मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं महाराष्ट्रात, मायदेशी आणली जाणार आहेत, हे देशासाठी अभिमानास्पद असून काहीजण मात्र त्याबाबत शंका उपस्थित करत आहेत. वाघनखांबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून, अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतो आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.


पुढे ते म्हणाले, आमचे मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला स्वतः गेले. एक इतिहास असलेली वाघनखं आपल्या देशात, आपल्या राज्यात आणणं हे प्रत्येक देशवासीयासाठी गौरवास्पद, अभिमानास्पद आणि प्रत्येकाला हेवा वाटावा असं आहे. पण दुसरीकडे काही लोक सरकारच्या प्रत्येक कामावर विरोध, द्वेष, मत्सर व्यक्त करतात. परंतु सांस्कृतिक कार्य विभाग आपलं काम करेल, वाघनखं येतील आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वस्तू आणण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.



सीमेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे. भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भीती वाटेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. याआधीही सीमेवर पुतळा उभारण्यासाठी प्रस्ताव देण्यात आले होते मात्र आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यामुळे हा पुतळा लवकरच उभारला जाणार आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित