India Pakistan Border : पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवणार... सीमेवर उभारणार शिवरायांचा अश्वारुढ पुतळा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची वाघनखं (Wagh Nakh) महाराष्ट्रात आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) गेले अनेक दिवस प्रयत्न करत आहेत. मात्र, विरोधकांचे या गोष्टीवरुनही राजकारण करणे चालूच आहे. अनेकांनी वाघनखांवर प्रश्नदेखील उपस्थित केले. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वाघनखांबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठी घोषणा देखील केली.


मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं महाराष्ट्रात, मायदेशी आणली जाणार आहेत, हे देशासाठी अभिमानास्पद असून काहीजण मात्र त्याबाबत शंका उपस्थित करत आहेत. वाघनखांबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून, अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतो आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.


पुढे ते म्हणाले, आमचे मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला स्वतः गेले. एक इतिहास असलेली वाघनखं आपल्या देशात, आपल्या राज्यात आणणं हे प्रत्येक देशवासीयासाठी गौरवास्पद, अभिमानास्पद आणि प्रत्येकाला हेवा वाटावा असं आहे. पण दुसरीकडे काही लोक सरकारच्या प्रत्येक कामावर विरोध, द्वेष, मत्सर व्यक्त करतात. परंतु सांस्कृतिक कार्य विभाग आपलं काम करेल, वाघनखं येतील आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वस्तू आणण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.



सीमेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे. भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भीती वाटेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. याआधीही सीमेवर पुतळा उभारण्यासाठी प्रस्ताव देण्यात आले होते मात्र आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यामुळे हा पुतळा लवकरच उभारला जाणार आहे.

Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध