India Pakistan Border : पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवणार... सीमेवर उभारणार शिवरायांचा अश्वारुढ पुतळा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची वाघनखं (Wagh Nakh) महाराष्ट्रात आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) गेले अनेक दिवस प्रयत्न करत आहेत. मात्र, विरोधकांचे या गोष्टीवरुनही राजकारण करणे चालूच आहे. अनेकांनी वाघनखांवर प्रश्नदेखील उपस्थित केले. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वाघनखांबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठी घोषणा देखील केली.


मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं महाराष्ट्रात, मायदेशी आणली जाणार आहेत, हे देशासाठी अभिमानास्पद असून काहीजण मात्र त्याबाबत शंका उपस्थित करत आहेत. वाघनखांबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून, अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतो आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.


पुढे ते म्हणाले, आमचे मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला स्वतः गेले. एक इतिहास असलेली वाघनखं आपल्या देशात, आपल्या राज्यात आणणं हे प्रत्येक देशवासीयासाठी गौरवास्पद, अभिमानास्पद आणि प्रत्येकाला हेवा वाटावा असं आहे. पण दुसरीकडे काही लोक सरकारच्या प्रत्येक कामावर विरोध, द्वेष, मत्सर व्यक्त करतात. परंतु सांस्कृतिक कार्य विभाग आपलं काम करेल, वाघनखं येतील आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वस्तू आणण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.



सीमेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे. भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भीती वाटेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. याआधीही सीमेवर पुतळा उभारण्यासाठी प्रस्ताव देण्यात आले होते मात्र आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यामुळे हा पुतळा लवकरच उभारला जाणार आहे.

Comments
Add Comment

Miss India Earth 2019 : आतिफशी लग्न, मग धर्म परिवर्तन, आणि पुन्हा हिंदू धर्म.... या मिस इंडियाने पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे : ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ किताब जिंकलेली सायली सुर्वे सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सायली

म्युनिसिपल बाँडच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला गती!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'महाराष्ट्राच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा (ULB) ग्रीन

Heat Wave Alert: उन्हाची तीव्रता वाढली, राज्यातील 'या' जिल्ह्यांना हीट वेव्हचा इशारा

मुंबई: उन्हाळा वेळेआधीच तीव्र होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील तापमानाने पस्तिशी

Gas Cylinder: गॅस नियमांत मोठे बदल; पुण्यातील 'या' ग्राहकांना आता मिळणार नाही गॅस सिंलिंडर

पुणे: तुम्ही जर घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आतापासून KYC (केवायसी)

Heat wave in Maharashtra : राज्यात पुढील दोन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे.

Pune Traffic Update: पुणेकरांनो पोलीस भरतीमुळे 'या' भागातील वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर जाण्याआधी...

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई (चालक) पदासाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेतील अत्यंत