Mumbai pollution : मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी दीपक केसरकरांच्या नव्या उपाययोजना

समुद्रकिनारी स्वच्छतेसाठीही विशेष लक्ष देणार


मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या अनेक प्रकल्पांमुळे तसेच खराब वातावरणामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा (Air Quality) प्रचंड खालावला (Mumbai pollution) आहे. सकाळच्या वेळी लांबच्याच नव्हे तर जवळच्याही इमारती अंधूक दिसतात इतकं प्रदूषण मुंबईत वाढलं आहे. मुंबईच्या हवेचा दर्जा दिल्लीपेक्षाही खालवला आहे. त्यामुळे या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मोठ्या कंपन्या तसेच उद्योगांनीही यात सहभाग घेण्याची तयारी दर्शवली आहे.


मुंबईत प्रचंड लोकसंख्या वाढल्याने वाहनांची गर्दीही तितकीच वाढली आहे आणि हे प्रदूषणाचं एक मोठं कारण आहे. मुंबईत इमारती बांधण्याचे प्रकल्पदेखील वेगाने सुरु आहेत, त्यांच्या बांधकामामुळेही हवेत धूलिकण पसरुन प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. यांवर नियंत्रण आणणे तसेच रासायनिक कंपन्यांमधील प्रदूषण, जैविक कचरा जाळणे, स्मशानभूमीतील धुरामुळे तसेच डम्पिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या प्रदूषणावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, असं केसरकरांनी स्पष्ट केलं.


मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांवेळी नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूलिकण हवेत पसरतात आणि हवा प्रदूषित होते. त्याचबरोबर मुंबईतील विविध वायू प्रकल्प, रिफायनरी यातूनही वायुप्रदूषण होत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून (BMC) काही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच काही कंपन्या प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी तयार असल्याची माहिती केसरकरांनी दिली. त्यामुळे प्रदूषण रोखण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


समुद्रकिनारी देखील चौपाट्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली. मिठी नदी समुद्राला मिळते, त्यामुळे माहिमच्या समुद्राच्या भागाकडे लक्ष द्यावे लागेल. या भागात मिठी नदीतून वाहून येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. त्याची साफसफाई करावी लागेल, असं ते म्हणाले. पालकमंत्री केसरकर स्वतः सोमवारी माहिम ते दादर चौपाटी असा फेरफटका मारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे